मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Showing posts with label Durga Bhagwat. Show all posts
Showing posts with label Durga Bhagwat. Show all posts

Monday, May 18, 2026

दुर्गाबाई कॉवेलच्या व्हिक्टोरियन फाजील ईश्शबाईला बधणाऱ्या नव्हत्या...Kacchapa Jataka 273

 

विलास सारंग त्यांच्या लेखक म्हणून कारकिर्दीत पहिल्या काळात दुर्गाबाईंकडे लक्ष देत नसावेत असे स्पष्ट दिसते पण जसे ते टिकावू अशा भारतीय प्राचीन वाङ्मयाकडे , बुद्धाकडे वळले , त्यांना दुर्गाबाईंची महानता लगेच समजली ...
त्यांच्या 'लिह्त्या लेखकाचं वाचन' मध्ये २०११ च्या आवृत्तीत पान ८६ वर काय लिहतात पहा :
 

 त्याच लेखात ते पुढे लिहतात :
 

 (कै सारंगांना त्यावेळी प्रकृतीमुळे एकच हात उचलता येत होता , म्हणून काहीसा डार्क ह्युमर दोन हाती नमस्काराच्या ऐवजी एकहाती सलाम, कॉवेल म्हणजे Edward Byles Cowell, FBA (23 January 1826 – 9 February 1903) )
 
त्या जातक कथेचं नाव आहे  :The Story about the Biting Turtle चावणाऱ्या कासवाची गोष्ट  कच्छप जातक २७३  

 The Bodhisatta was once an ascetic. He lived alone in the Himalayas, and while he was sitting in daily meditation in his leaf hut, a mischievous, horrible monkey would come and ejaculate in his ear. But being blissfully calm, the Bodhisatta was not disturbed and did not stop him. One time the monkey saw a turtle sunning itself with its mouth open and he stuck his penis in it. The turtle bit down hard, leaving the monkey in agony. He realized that only the Bodhisatta could end his suffering, so he lifted the turtle with both hands and went to see him.

It looked like the monkey was holding an alms bowl, so the Bodhisatta jokingly asked, “Who are you, a brahmin? Where did you go to collect so much food?” implying the monkey was greedy. The monkey replied, “I’m just a foolish monkey who touched something I shouldn’t have. Set me free and I will go away.” The Bodhisatta said, “The marriage between your clans has been consummated: turtle, you can stop having sex now.” On hearing the Bodhisatta’s words, the turtle and the monkey released their grips. They both showed respect to the Bodhisatta and left, the monkey running far away, never to return.

The monkey and the turtle were earlier births of two high-ranking soldiers who hated each other and spoke rudely every time they met. Neither the king nor their friends and family could set them right. One day the Buddha divined that these two men were close to having a spiritual breakthrough, so the next morning he went out collecting alms at their houses. While sitting with them, the Buddha preached about loving-kindness and dharma so eloquently that they both became disciples. The two soldiers forgave each other and were harmonious from then on.

Later, when the Buddha heard some of his disciples discussing how he had humbled the two soldiers, he told them this story so they knew that he had also reconciled the same two men in previous lives. 

 

Thursday, March 26, 2026

करिअरिस्टांची अखेर आणखी कशी असते?..J. Robert Oppenheimer and Many of Us


 लेखक: दत्तो वामन पोतदार (१८९०-१९७९) , ऑगस्ट १९४५, वाङ्मय शोभा 

Isaiah Berlin:

 "The German poet Heine, in one of his famous writings, told us not to underestimate the quiet philosopher sitting in his study; if Kant had not undone theology, he declared, Robespierre might not have cut off the head of the King of France.",

दुर्गा भागवत, 'इरावती कर्वे', "आठवले तसे", १९९१-२०१४:

"... पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपदही त्यांना मिळाले नाही. अखेर त्यांची परिपूर्ती त्यांच्या लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे आनंदची 'आई' होण्यात नव्हती, तर मातृत्वाचा डौलही ठिसूळच होता का? अखेर परिपूर्ती होती ती मोठ्या नोकरीतच ना? खोट्या प्रतिष्ठेतच ना? ही परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली. आयुष्यच सरले त्याला काय करणार? नाहीतर त्यांची इच्छापूर्ती हीच परिपूर्ती ठरली असती. करिअरिस्टांची  अखेर आणखी कशी असते?"

Ray Monk , ‘Inside the Centre: The Life of J. Robert Oppenheimer ‘, 2012:

“…There was no group to whom he could point and say, ‘These are my people’, and not just because of his ambivalence about his Jewish background. It was also because that background itself, regardless of Oppenheimer’s feelings about it, could not have provided him with the sense of belonging and, therefore, the sense of identity that Rabi thought was missing in him. Rabi, despite his lack of religious beliefs, was Jewish in a fairly straightforward and unambiguous way; the Jews simply were ‘his people’. Theirs was the community to which he belonged. One cannot say the same about Oppenheimer. The sense in which he was Jewish, the sense in which he did – and did not – come from, and belong to, a Jewish community, is far more complicated and, as Rabi has perceptively noted, crucial in understanding the fragility of his sense of identity….”

हे वाचून मला वाटले , हीच अवस्था आपल्या कित्येकांची आहे... १९४७ नंतर , गोपाळ गणेश आगरकरांचा असलेला महाराष्ट्रातील शिकलेल्या लोकांवर असलेला प्रचंड प्रभाव  , धर्माची आपल्या अंतरमानसावरील ढिली पडलेली पकड यामुळे आपली ओळख काय असे मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत ... 


Thursday, November 23, 2023

Banabhatta: My Name is Red!...बाण, दुर्गा भागवत आणि राजा रवी वर्मा

दुर्गा भागवत:
 
"... 'थोडी चित्रमयता आणि लाल रंगाची अनावर ओढ यामुळे बाण वाचावा' असं मात्र गुरुदेव टागोरांनी म्हटलं आहे..."
 
('बाणाची कादंबरी आणि मी', 'अबकडइ', दिवाळी १९८४, पृष्ठ १८१, 'भावसंचित', २०१५)
 
[ ओरहान पामुक यांच्या "My Name is Red", १९९८ ह्या त्यांच्या नोबेल पुरस्काराला हातभार लावणाऱ्या कादंबरी प्रमाणे असे वाटते बाण (इ स. सातवे शतक) सुद्धा म्हणतायत "My Name is Red"!]
 
"She was young, and dark like Mohini who beguiled the asuras into parting with the nectar. Indeed she was like a walking sapphire doll. Her body was covered down to her ankles in a dark-coloured robe. Over her head she wore a red silk veil. It was like the red rays of the morning sun falling on a field of blue lilies. On one of her ears there hung a dantapatra, an ivory ear ornament whose radiance seemed to render her cheek a little pale, even like the rays of the rising moon lightening the darkness of the night. Her brownish tilaka done in gorochana was like a third eye. Her slender waist could have been grasped by one hand, like the floral bow of Manmatha.
She was like autumn with her wide eyes like white lily blooms.
She was like the rainy season with her cloud mass of dark tresses.
She was like Shri with the lotus lustre of her palms...."
 
('Kadambari' by Bana , translated by Padmini Rajappa)
 
picture: 'Kadambari' by Raja Ravi Varma
 
 

Saturday, November 11, 2023

दुर्गाबाई, जी. ए आणि नवपरिवर्तन....Durga Bhagwat, G. A. Kulkarni and the Hero

 

दुर्गाबाई भागवतांची अनेक पुस्तके वाचून माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या वाङ्मयाबद्दल मतप्रदर्शन केलेले नाही... 
 
'ऐसपैस' मध्ये तर प्रतिभा रानडे त्यांच्या समोर जी एंचा विषय काढतात पण त्यावर दुर्गाबाईंचे भाष्य होत नाही ... याचे मला काही वर्षे कुतुहूल वाटत आले ... 
 
परवा वॉल्डेन बुक स्टोअर Walden Book Store मधून "शासन , साहित्यिक आणि बांधिलकी", १९८८/२०१८ हे दुर्गाबाईंचे पुस्तक मागवले.... दुर्गाबाईंनी (बहुदा) १९८४ साली दिलेल्या तीन व्याख्यानांवरती आधारित ते पुस्तक आहे ... बहुदा कारण नक्की तारखा पुस्तकात कोठेही दिल्या नाहीत ... 
 
त्यातील पृष्ठ १२५ वर ठळक परिच्छेद आहे : "जी. एं. ची कैरी कथा"... काय आनंद झाला म्हणून सांगू ... माझी जीएंची सर्वात आवडती कथा कदाचित दुर्गाबाईंची सुद्धा जीएंची सर्वात आवडती कथा असू शकेल... हा परिचछेद आहे पुस्तकातील चौथ्या प्रकरणात "स्वाधीनता आणि आम्ही".... 
 
दुर्गाबाई जीएंचा फार मोठा बहुमान करत त्यांना म्हणतात : ते स्वाधीन लेखक आहेत... 
 
जी. ए. स्वाधीन लेखक आहेत म्हणजे काय?
 
त्याची एक महत्वाची कसोटी:
 
"... मनुष्य निव्वळ पारदर्शक प्रामाणिक हवा. इतरांशी पण मुख्यतः आणि विशेषत्वाने स्वतःशी. इतरांना त्याने फसविता कामा नये आणि स्वतःलाही फसविता कामा नये. सर्व प्रकारची आत्मवंचना त्याला टाळता आली पाहिजे..."
 
जी. ए. असे लेखक आहेत...
 
त्यांनी लिहलेल्या शेकडो पत्रांतून ही गोष्ट आणखीच अधोरेखित होते...
 
मला जीएंच्या अनेक गोष्टींबद्दल मतभेद आहेत, पण मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट : त्यांचा "निव्वळ पारदर्शक प्रामाणिकपणा"
 
जीएंच्या "कैरी"तल्या मुलामध्ये मी स्वतःला पाहतो... 
 
माझी आयुष्याची पहिली जवळ जवळ २१ वर्षे मिरज शहरामध्ये गेली... अत्यंत प्रेम, माया, लाड करणारी, अत्यंत सुंदर दिसणारी आई मला माझ्या वयाच्या ४६ व्या वर्षांपर्येत मिळून सुद्धा मी त्या मुलाच्या आयुष्यातील अनिश्चितता समजतो... 
 
कारण माझ्या आईच्या दोन सर्जरी झाल्या एक (बहुदा) १९७२ साली आणि दुसरी १९७८ साली... दोन्ही थोड्या परिस्थिती गंभीर झाल्या नंतर... दोन्ही मध्ये , विशेषतः १९७८ मध्ये आई जाऊ शकत होती... त्यावेळी मी इंजिनीरिंग च्या दुसऱ्या वर्षाला होतो आणि माझे वडील अत्यंत चिडके/ अधिक रागीट/ deeply frustrated झाले होते, ... 
 
भारतातील बहुतेक मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती १९४७ पासून १९९५ पर्यंत ओढाताणीची असे, त्या गोष्टीचा माझ्या वडलांच्या वागण्यावर मोठा परिणाम झाला होता... बहुतेक गरीब लोकांना दोन वेळचे पोटभर चांगले जेवण सुद्धा मिळत नसे...
 
आणि माझी आई गेली असती तर माझे आयुष्य कैरीतील मुलाच्या बरेच जवळ जाऊं शकले असते ..
 
त्यामुळे कैरी पहिल्यांदा १९८२ साली वाचल्यावर एका प्रकारे हायसे वाटले, आपण वाचलो म्हणून.. तो पर्यंत आई मुळे माझ्या हातात नैसर्गिकरित्या पिकलेला आमच्या मिरजेचा (म्हणजे कोकणातून आलेला) अस्सल हापूस किंवा पायरी होता, कैरी नव्हे!
 
Nassim Nicholas Taleb:
 
"... My very first impression upon a recent rereading of the Iliad, the first in my adulthood, is that the epic poet did not judge his heroes by the result: Heroes won and lost battles in a manner that was totally independent of their own valor; their fate depended upon totally external forces, generally the explicit agency of the scheming gods (not devoid of nepotism). Heroes are heroes because they are heroic in behavior, not because they won or lost...." 
(Fooled by Randomness, 2001)
 
दुर्गाबाईंना जीएंची रूपक कथा खूप आवडते ज्यावेळी ते पाश्चात्य परीकथा व पुराकथा पचवून त्यांचे नवपरिवर्तन आपल्या कथांमधून करतात.
 
दुर्गाबाईंच्या मते, वर Taleb यांच्या quote मध्ये आलेल्या, पाश्चात्य परीकथा व पुराकथा मधल्या "वीर नायकाला सक्तीनेच स्वतःचे घर सोडावे लागते कारण बाप आपल्या मुलाचे व्यक्तित्व खच्ची करतो हा आजवरचा जगाचा अनुभव."... आणि मग तो धोका पत्करून, शौर्य गाजवून अमृतफळ, सुवासिक पाणी , गुलाबकावलीचे फूल असे काही अद्भुत, अप्राप्य आणि त्या बरोबर त्या वस्तूची मालकीण सुंदर राजकन्या मिळवून'परत घरी येतो. 
 
दुर्गाबाईंना कैरीतील मुलगा प्राचीन हिरोची नवी आवृत्ती वाटते.
 
मात्र आजच्या हिरोला आपला मावशीकडील प्रवास अर्ध्यावरच सोडायला लागतो आणि परत मामाच्या घरी यावे लागते... हाती अमृतफळ पडत नाही तर पडते न पिकलेला आंबा म्हणजे कैरी....
 
"ही कथा शोकाची भावनाच नव्हे कारुणाची संथ लयसुद्धा निर्माण करते." (दुर्गाबाई गौतम बुद्धाच्या करुणे कडे नेहमी येत असतात)
 
पण हाती कैरी पडली म्हणून काय झाले? Heroes are heroes because they are heroic in behavior, not because they won or lost...
 
कैरीतील मुलगा हिरो आहे, त्याच निकषाने मी हिरो नाही कारण मी कधी त्याच्या वयात अशा प्रवासाला बाहेर पडलोच नाही...
 
Joseph Campbell:
"... The modern hero, the modern individual who dares to heed the call and seek the mansion of that presence with whom it is our whole destiny to be atoned, cannot, indeed must not, wait for his community to cast off its slough of pride, fear, rationalized avarice, and sanctified misunderstanding. “Live,” Nietzsche says, “as though the day were here.” It is not society that is to guide and save the creative hero, but precisely the reverse. And so every one of us shares the supreme ordeal—carries the cross of the redeemer—not in the bright moments of his tribe’s great victories, but in the silences of his personal despair." 
 
(The Hero with a Thousand Faces, 1949)
 
काय योगायोग पहा! मी आयुष्यात फक्त दोन मराठी लघुकथा लिहल्या ज्या "अभिरुचि" मासिकात मार्च-एप्रिल १९८४ मध्ये आणि जान-फेब १९८५ मध्ये प्रसिद्ध झाल्या... 
 
त्यातील पहिली कथा होती "रेको (अर्थात रेकमंडेशन)- ती कथा मी महाभारतातील आदिपर्वातील धौम्य ऋषी आणि त्यांचा शिष्य आरुणी यांच्या वर आधारित लिहली होती..
 
आरुणी बांधाचे पाणी स्वतः झोपून अडवतो कारण त्याला गुरुजींचे अमेरिकेत जाणयासाठी रेकमंडेशन हवे असते!... माझ्या आय आय टी तील वर्षांचा आणि तेथील विद्यार्थ्यांच्या वागणुकीचा आणि जी.एं. च्या पिंगळावेळचा त्यावर प्रभाव होता... (अभिरुचीचे अनुक्रमणिका पान आणि कथेची पाने सोबत)
 
दुर्गाबाई म्हणतात :
"... माणसाच्या अध्यात्मिक प्रकृतीवर सूत्रमय भाष्ये करणारे ललित वाङ्मय आमच्याकडे फारसे नाही. पुराकथांच्या रसायनातून जेंव्हा कथा, कादंबऱ्या जन्म घेतात तेंव्हा त्यात ही प्रज्ञा स्वाभाविकपणे प्रकट होते. आपल्याकडे पुराकथांवर आधारित नवे वाङ्मय अजिबात नाही असे नाही. या संदर्भात मला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव घ्यावेसे वाटते. पाश्चात्य परीकथा व पुराकथा पचवून त्यांचे नवपरिवर्तन आपल्या कथांमधून जेव्हा जी. ए. करतात तेव्हा मनाला खूप आनंद होतो..."
(पृष्ठ १२५, 'शासन, साहित्यिक आणि बांधिलकी', १९८८/२०१८)
 
ज्यावर्षी दुर्गाबाई हे म्हणत होत्या त्याचवर्षी माझी कथा अभिरुचि सारख्या मासिकात प्रसिद्ध होत होती याचे आज खूप समाधान वाटते...  
 



 

Saturday, October 15, 2022

...बगळे म्हणजे तृप्तीचे मूर्तिमंत प्रतीक...Durga Bhagwat and H. George Brandt


 दुर्गा भागवत, 'ऋतुचक्र' (१९५६- २००२), 'सोनेरी अश्विन', पृष्ठ ७३  

 


 House & Garden magazine cover illustrated by H. George Brandt. October 1917

Saturday, September 03, 2022

पिवळीच मी पाकोळी की...Thistle in a Field

 हे अतिशय सुंदर, १८७५ सालचे, वाळवंटातील झुडूप आणि त्यावरील फुल बघून मला " रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला" आठवत नाही....

ना आठवते "वन सर्व सुगंधित झाले/ मन माझे मोहुन गेले - कितीतरी"...

तर आठवते दुर्गाबाईंचे "पिवळीच मी पाकोळी की" (निसर्गोत्सव, 1996)......

 Thistle in a Field, 1875., कलाकार: Fidelia Bridges (1834-1923)

Wednesday, June 22, 2022

कंठस्नान आणि बलिदान'.....125 Years After June 22 1897

श्री. मीना वैशंपायन संपादित "विचारसंचित", २०१५ मधील  दोन लेख वाचले.

१>'चेष्टेचा विषय व्हावा तसे रंगविलेले कथानक २२ जून १८९७" , १९८० हा चित्रपट समीक्षा लेख :

२२ जून १८९७ हा १९७९ सालचा 'गाजलेला' आणि बहुपुरस्कृत सिनेमा मी पाहिलेला नाही, आणि तो पहिला नाही याबद्दल बरे वाटले इतके या चित्रपटाचे वाभाडे दुर्गाबाईंनी काढले आहेत.

या शतकात 'पिरियड' टीव्ही आणि चित्रपटांचे मराठीत पेव फुटले आहे. त्या पार्श्व् भूमीवर प्रत्येक प्रेक्षकाने मन लावून तो लेख वाचावा आणि परीक्षण लिहणाऱ्यांनी किती अभ्यास केला पाहिजे हे समजण्यासाठी तो लेख वाचावा.

चित्रपटाचे संवाद विजय तेंडुलकरांचे आहेत आणि त्यात किती ढिसाळपणा आणि खोडकरपणा आहे त्याचे एक उदाहरण खालील एका परिच्छेदात पहा.

त्या शिवाय पुरुषांची वेशभूषा, बायकांची वेशभूषा, पुरुषांची केशभूषा, स्त्रियांची केशभूषा, पुरुषांची शरीरयष्टी, मराठी भाषा, दुर्लक्षिलेला पण अत्यंत महत्वाचा मुंबई शहराचा चापेकरांच्या आयुष्यातील रोल, कीर्तनाच्या दृशांची मांडणी, रँडच्या पुण्यातील पापांचा घडा उघडा न पाडणे हे सगळेच मोठ्या प्रमाणात ढिसाळ आणि वास्तवाला विसंगत आहे.

(दुर्गाबाईनी सत्यजित रेंचा 'घरे बाईरे', १९८४ हा पिरियड सिनेमा बघितला का हे माहित नाही पण त्यांना तो नक्की आवडला असता.)

२> 'कंठस्नान आणि बलिदान', १९७४ हा पुस्तक समीक्षा लेख:
....
हा लेख वाचून मला लक्षात आले की मी हे पुस्तक पूर्वीच मिळवून वाचायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. एवढा अभ्यास, एवढे संशोधन १९व्या शतकांतील महाराष्ट्राच्या इतिहासासाठी (काही देशभक्त आणि काही समाजसुधारक यांच्या बाबत सोडता) क्वचितच झाले आहे. (महाराष्ट्राच्या सुदैवाने य दि फडके यांनी सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर केले.) .

दुर्गाबाईंनी विष्णु श्रीधर जोशी यांचे ते पुस्तक कसे थोर आहे हे सिद्ध केलय. शेवटी त्या म्हणतात: "महाराष्ट शासनाने या ग्रंथाची इंग्रजी व भारतीय भाषांत भाषांतर करून घेणे आगत्याचे आहे."...

इतर भाषांतील भाषांतराचे मला माहित नाही पण त्याचे मराठीत भाषांतर होणे गरजेचे आहे कारण आज २०१९साली ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट आहे... बाजारात कुठेही विकत मिळत नाही!










कृतज्ञता: दुर्गाबाईंच्या साहित्याचे  कॉपीराईट होल्डर्स बद्दल,










मुखपृष्ठ कलावंत: रविमुकुल

Saturday, May 07, 2022

आमच्या बोटांना पाकळ्यांचा रेशमी स्पर्श शिकवला...Remembering Durga Bhagwat, 20 Years After Her Death

आज मे ७ २०२२, दुर्गाबाईंना जाऊन २० वर्षे झाली

या एका परिच्छेदात कलावंत दूर्गाबाईंची सर्व शक्तीस्थळे दर्शनास येतात ...

एक स्त्री, एक naturalist , एक चौफेर वाचन असलेली ललित लेखक जिचे लेखन काव्याच्या सीमेवर लीलया जात असते , एक सौन्दर्यासक्त, एक मानवतावादी ....

दुर्गा भागवत:

"... गुलाबपुष्प काही भारतीय फूल नव्हे. आपले फूल कमळच. पण नूरजहाँच्या वेळेपासून गुलाब भारतात बहरला. तो होता लाल लाल वसंत गुलाब नि आपला नेहमीचा सुगंधाची बरसात करणारा लहान, देशी गुलाब. यानेच आपल्याला अत्तर दिले. गुलाबपाणी दिले, गुलकंद दिला. यानेच गरिबांची लहान लहान परसदारेही सुशोभित नि सुवासिक केली. यानेच आम्हाला लहानपणापासून आपल्याबरोबर बागडू दिले. आमच्या बोटांना पाकळ्यांचा रेशमी स्पर्श शिकवला. याच्या अर्धोन्मीलित कळीनेच हसू-रुसूच्या-प्रीतीच्या खेळाचे रहस्य वयात येणाच्या वेळी आम्हाला सुगंधाच्या भाषेत सांगितले. यानेच जीवनाची भंगुरता दाखवली नि अमर सुगंधाच्या आत्म्याची खूण पटवून दिली. वाळल्या तरी पाकळ्या सुगंधी. यानेच आमच्या केसांना शोभा दिली . गंध दिला. यानेच आम्हाला रंग पारखायला शिकवले. यानेच काट्यांचे भयानक अस्तित्व ठायी ठायी असते हे पटवून दिले...."

(पृष्ठ ४६-४७, 'भावसंचित', २०१५, संपादन : मीना वैशंपायन )


The Rose (undated) by Eugene de Blaas (Italian, 1843-1932)

Sunday, November 28, 2021

शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांची 'मंदिरपथगामिनी', रवींद्रनाथ, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर आणि दुर्गाबाई भागवत...An Iconic Sculpture and The Feelings It Evoked

अलीकडे 'उत्तम माध्यम', २०१० हे श्री. बा. जोशी यांचे पुस्तक विकत घेतले आणि चाळायला सुरवात केली. 

त्यातील तिसऱ्या लेखाचे नाव आहे 'प्रतिभेचे इंद्रजालच'. तो लेख मूळ २१ मे  १९८८ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेला आहे, आणि गणपत काशिनाथ म्हात्रे (१८७६- १९४७) या महान शिल्पकाराच्या 'मंदिरगामिनी' ह्या साधारण १८९६ सालच्या शिल्पावर (प्रथम शाडूचे आणि नंतर संगमरवरी) आहे. 

मराठी विश्वकोश, खंड १०: "... मंदिराकडे जाणाऱ्या या स्त्रीच्या शिल्पाकृतीचा पेहराव व ढब अस्सल भारतीय असून, ब्रिटिश शिल्पशैलीच्या प्रभावापासून ती मुक्त आहे. तिने परिधान केलेल्या नऊवारी साडीच्या सुरेख चुण्यांमधून तिच्या बांध्याचे सौष्ठव व्यक्त होते. तिची केशरचना, एका पायावर भार देऊन किंचित टाच उचलून दुमडलेला दुसरा पाय व त्यातून व्यक्त होत असलेला मंदिराकडे जाण्याचा आविर्भाव हे अत्यंत लालित्यपूर्ण आहेत. शिवाय तिचे कोमल हात, बोटे, रेखीव चेहरा आणि नाजुक पाऊल ह्यांचे शिल्पांकन मोठ्या कौशल्याने केले आहे...."

ह्या शिल्पाचे रसग्रहण खुद्द रवींद्रनाथांनी दोन लेखांत केले होते. त्यावरच जोशींचा पाच पानी लेख आहे. टागोरांचे अतुलनीय शब्द त्या लेखात वाचा. 



 त्याच पुस्तकात ह्या मटातील लेखावर दुर्गाबाईंचे दोन पानी पत्र आहे. तारीख २८ मे १९८८. दुर्गाबाई म्हणतात त्या शिल्पाचा उल्लेख इंग्लिश मध्ये 'lady with lamp' असा सुद्धा झाला होता. त्या म्हणतात डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या डोळ्यांतून हे शिल्प पाहून अश्रूंचा पूर लोटला होता. 

दुर्गाबाईंची अतिशय सुंदर असणारी आई १९१९ साली फ्लू च्या साथीत वारली. ते शिल्प म्हणजे त्यांना त्यांच्या आईची मूर्ती वाटली. 





 त्या पत्राचा एक छोटा भाग वर दिला आहे. 

सौजन्य: दुर्गा भागवत यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स

Sunday, June 06, 2021

भारतीय लोककथांची एक महत्वाची दूत ...Folk Literature Recommended by Durgabai Bhagwat

 दुर्गाबाई भागवत जानेवारी १९६३ मध्ये लिहतात : 

"... भारतीय लोककथांच्या पहिल्या पाच संग्रहातले हे एक पुस्तक आहे.  मेरी फ्रियरचे Old Deccan Days, मेव्ह स्टोक्सचे Indian Fairy Tales, नटेश शास्त्री यांचे South Indian Tales, लाल बिहारी डे यांचे Tales of the Bengal, आणि फ्लोरा स्टीलचे Tales of the Punjab ही ती पाच पुस्तके. 

लोकसाहित्याच्या अभ्यासकाला या पाची संग्रहांची माहिती असणे आवश्यक आहे एवढेच नव्हे, तर ते संग्रहही जवळ असणे अगत्याचे आहे..." ('भारतीय लोककथांची एक अग्रदूत : फ्लोरा ऍनी स्टील', भावसंचित, २०१५)

ही १८६८ ते १८९४ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेली पाचही पुस्तके  प्रोजेक्ट गुटेनबर्ग ह्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. (इतरत्रही उपलब्ध आहेत.)

 Tales of the Punjab told by the people, 1894 by Flora Annie Webster Steel

Old Deccan Days; or, Hindoo Fairy Legends Current in Southern India, 1868 by Mary Frere

Indian Fairy Tales, 1879 by Maive Stokes

Tales of the Sun; or, Folklore of Southern India, 1890 by Lucas Cleeve & Pandit Natesa Sastri

Folk-Tales of Bengal (1883, illustrations by Warwick Goble dated 1912) by Lal Behari Day


  artist: Warwick Goble for Folk-Tales of Bengal by Lal Behari Day

Sunday, August 09, 2020

वाल्मिकी, चिं वि वैद्य आणि दुर्गाबाई- निसर्ग आणि पर्यावरण...Valmiki, C V Vaidya and Durgabai

दुर्गाबाई ह्या भारतीय अभिजात लेखकांच्या परंपरेतील एक महत्वाचे नाव आहे.

आपण जाणतो की निसर्ग हा त्यांच्या किती जिव्हाळ्याचा विषय होता- आणि साहजिकच तो त्यांच्या लेखनात वारंवार येतो.

रामायणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील निसर्ग/ पर्यावरण वर्णने.

भारताचार्य चिं वि वैद्य यांनी "रामायण कथासार", १९११ हे एक पुस्तक लिहले. त्याचे मला वाटलेले वैशिष्ट्य म्हणजे वैद्यांनी निसर्गवर्णनांकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. आपण जी बहुतेक मराठी-हिंदीतील रामायणे (त्यात चांदोबा, अमर चित्र कथा, दूरदर्शन आले) वाचतो किंवा (आश्चर्य म्हणजे) टिव्ही किंवा सिनेमात पाहतो ती कथेवर फोकस असतात.

सोबतचा थोडा मोठा परिच्छेद, अरण्यकांडातील (पृष्ठ १११-११२) पहा.

निसर्ग नुसता ओसंडून वाहतोय: हिवाळा, धान्य, गवत, सूर्य, कुंकू न लावलेली स्त्री, दक्षिणोत्तर, चंद्र, हिम, तुषार, हत्ती आणि त्यांच्या सोंडा , हंस, कारण्डव, शिपाई, युद्ध, सारस, डोंगर, डोंगरमाथा , सरोवर, कमळ, पाने, जीर्णत्व , गोदावरी, शरयू, नदीस्नान...

(राम, सीता , लक्ष्मण आताच्या नाशिकमध्ये [पंचवटी] राहायला आल्यावरचे ते वर्णन आहे. मी स्वत: नाशिकला दोन वर्षे राहिलो आहे आणि माझे वडील १९७४ पासून आणि नंतर आई १९८५ पासून त्या दोघांच्या मृत्यपर्यंत नाशिकमध्येच होते. हिवाळ्यातील नाशिक ची थंडी आणि ऊन मी ओळखतो. दुर्दैवाने २०२० साली पर्यावरणाबद्दल जास्त बोलू नये हे बरे पण १९८७-८९ मध्ये मी वाल्मिकींचे नाशिक किंचित चाखले आहे!)

  सोबतचा परिच्छेद संपताच तिथे शूर्पणखा येते!

 कृतज्ञता: चिं वि वैद्य यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स आणि वरदा प्रकाशन, पुणे

Thursday, June 25, 2020

कधीच न संपणारे सांगली आकाशवाणीवरचे 'हम होंगे कामयाब'...The Emergency@45

४५ वर्षांपूर्वी , जून २५ १९७५ रोजी, आज देशात आणीबाणी लावली गेली.

त्यावेळचे माझे ११-१२ वीचे अस्वस्थ करून टाकणारे दिवस (काहीसे कोरोनामुळे आत्तासारखेच) मला आठवतात (माझ्या डोळ्यादेखत माझ्या मित्राला अटक झाली)...शिस्तीचे मला माहित नाही पण दहशतीचे वातावरण पहिले कित्येक महिने तयार झाले होते.....

गरुडपुराणासारखे सांगली आकाशवाणीवर 'हम होंगे कामयाब' रट लावत असे ...

ज्यावेळी मी पुढे 'जाने भी दो यारों' सिनेमात ती दोघे (नसीरुद्दीन शाह, रवि वासवानी) ते गाणे म्हणत शेवटी फासावर जातात हे पहिले त्यावेळी सर्वात जास्त हसू आले....(त्यांनी विनंती केली असेल की ह्या गाण्यापेक्षा आम्हाला फासावर चढवा !)....

अध्यक्षीय भाषण : दुर्गा भागवत , कऱ्हाड साहित्य संमेलन, १८ नोव्हेंबर १९७५:
"...सांगण्याचा हेतू काय की, माणसाची स्वत्वाची स्वतःच ठरवलेली कसोटी असल्याशिवाय सर्वसामान्य लोकांच्या नाममात्र कसोट्यांवर भिस्त ठेवून लौकिक यश कितीही पदरात पडलं, तरी त्यामुळे त्या तथाकथित विचारवंताला भविष्यकाळाचं निदान करणं जमत नाही. भविष्यकाळात बघण्याची दृष्टी असल्याशिवाय कुठलीही मानवी समस्या खऱ्या रितीनं आकलन करणंही शक्य नसतं. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी, आपला व समाजाचा अभिमान व अस्मिता टिकवण्यासाठी संघर्षमय इतिहासाच्या अनुषंगानंच बुद्धिजीवी माणसं वर्तमान परिस्थितीचं वास्तवदर्शन घेऊ शकतात, आणि आपला रास्त अभिमान कायम राखू शकतात. 'स्वतःच्या लायकीच्या जाणिवेतच आपली खरी सुरक्षितता असते' हे ट्रूमिनचं वाक्यदेखील या संदर्भात विसरता येत नाही..."


Thursday, February 07, 2019

प्रतिमेचे दहन!....Book Burning: Mankind's Old Habit


 'प्रतिमा' या भासाच्या नाटकाबद्दल (Pratima-nataka: The statues) द ग गोडसे ( 'नांगी असलेले फुलपाखरू', १९८९ ) लिहतात:


त्याच पुस्तकाबद्दल दुर्गा भागवत लिहतात :
"... पण भास हा वास्तव दाखवणारा होता, त्यानं प्रत्येक व्यक्तीकडे मानवी दृष्टिकोनातूनच पाहिलं. त्यांना देवत्व दिल नाही. 'प्रतिमा' नाटकात त्याने रामायणातील वेगळंच नाट्य दाखविलं आहे.....
...., पण ते लोकांना आवडलं नाही. त्यांनी ते नाटक जाळून टाकलं होतं. पुढे मग शेकडो वर्ष गेल्यानंतर कोणीतरी हे 'प्रातिमा' नाटक परत शोधून काढलं. म्हणून ते आपल्याला मिळालं..."

(पृष्ठ ४८, "ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी", लेखक : प्रतिभा रानडे, १९९८)




 "The Philistine; Books to Burn!!" poster (c 1890s) 

कलाकार:  W. W. Denslow (1856-1915)  (modified by me)

Image source: The New York Public Library


Thursday, October 04, 2018

कुठे आहे स्ट्राइंडबर्ग यांची दुखरी नस?... Searching GA's Epigraph

Shallow people demand variety – but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve.
                                                              Strindberg


ज्यांनी ज्यांनी "पिंगळावेळ" नुस्त उचलून उघडून बघितलंय , त्या सर्वांना हे अर्पणपत्रिकेतील (चपखल शब्द epigraph) वाक्य वीजेसारखे चमकते... जीए हे 'वेगळे' लेखक आहेत याची जाणीव तिथून सुरु होते, किमान माझ्याबाबतीत ती १९८१ साली झाली....

जीएंच ते मला ब्ध्येय  वाक्य वाटत... "माझ्या लेखनात नावीन्य पाहू नका, माझ्या प्रत्येक कथेकडे दुखऱ्या नसेकडे जायचा प्रयत्न म्हणून पहा."

अलीकडे वाटू लागले हे वाक्य इतके भारी आहे, याच्या आजूबाजूचा परिसर पण तसाच तेजस्वी असेल. म्हटल बघूया कुठे आहे ते वाक्य....स्ट्राइंडबर्ग (१८४९- १९१२) यांचे सर्व लेखन गेली कित्येक वर्षे पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि ठिकठिकाणी उपलब्ध आहे.....

मला मात्र हे वाक्य स्वीडिश स्ट्राइंडबर्ग  यांच्या कोणत्याही इंग्लिश मधील अनुवादित पुस्तकात अजून मिळालेले नाही!

त्यांच्या गाजलेल्या, सहजपणे इंग्लिश मध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांत पहिले. नंतर गूगल आणि Google Books वर शोधले Delphi Collected Works of August Strindberg (Illustrated)

Sue Prideaux यांच्या अत्यंत गाजलेल्या Strindberg यांच्या चरित्रात ('Strindberg: A Life', २०१२) मध्ये ते नाही ...

तुम्हाला कोठे मिळाल्यास जरूर कळवा .....

------ह्या संबंधित माझ्या दोन तीन  पोस्ट - एप्रिल ३ २०१६, जानेवारी ३० २०१७ , मार्च १२ २०१६-  When There Were No Wikipedia and Google...and Now That They Are Here... ,

  गोडसेंचा गोंधळ : कुठाय चांदण्यातील मखमली नीलिमा?...James Abbott McNeill Whistler's Two Nocturnes  आणि

  जी. एंचा पहिला यात्रिक अनुल्लेखित दुसर्‍याचा...Henry van Dyke's 'The Story of the Other Wise Man', 1895  पाहू शकता.

------त्याशिवाय फेसबुकवर लिहल्या प्रमाणे जी. एंची एक कथा 'संवेदना', वाङ्मय शोभाच्या जुलै १९५०च्या अंकात छापून आली होती. ती कथा अनुवादित आहे पण मूळ लेखकाचा, कॉपीराईट चा उल्लेख कुठेही नाही!

.---- त्यांची आणखी एक कथा 'नारिंगी हातरुमाल' वाङ्मय शोभा डिसेंबर १९५० च्या अंकात आहे, पुन्हा अनुवादित पुन्हा मूळ लेखकाचा , कॉपीराईट माहितीचा उल्लेख नाही...

---- तसेच :
ऑक्टोबर ९ १९५९ला श्री पु भागवतांना लिहलेल्या पत्रात, जीए, रॉबर्ट ग्रेव्हस यांच्या एका कवितेच्या दोन ओळी quote करतात :

 "Alas, it is late
Already bolder tenants are at the gate."  


त्या ओळी तशा नाहीत तर अशा आहेत: 
"Too far, too late:
Already bolder tenants were at the gate." , 

'Here Live Your Life Out!' from 'The New Yorker', March 1959....

....  भरपूर फरक आहे, दोन अवतरणांमध्ये 

-----In one of the most impressive passages from N G. Kalelkar's (ना गो कालेलकर) book '"bhasha ani sanskriti" (भाषा आणि संस्कृती) he says:

When a class containing Lord Byron (1788 – 1824) was asked to write an essay on the subject of the Last Supper, Byron wrote just one line- 'The water saw its Lord and blushed'...Water in Latin is feminine...etc. etc. (page 47, edition December 1982)

This moved me so much that since my first reading of it in the 1980's, I memorised it and kept quoting it in my conversations.

There are a couple of problems with this.

First, it was not the Last Supper but Marriage at Cana. And second, it was not Lord Byron- then a third grade boy- who first said this. In fact it was Richard Crashaw (c.1613-1649) who wrote:

'The conscious water saw its God, and blushed' (original in Latin: Nympha pudica Deum vidit, et erubuit)

I feel Kalelkar should have attributed this to Crashaw but did he know that it was Crashaw who first wrote it?


 A lot of stuff written in Marathi has gone unchallenged.

पुस्ती : हे वाक्य Strindberg यांचे नसून जीएंचे असल्यास मला त्यांच्या बद्दल वाटणारा आदर आणखी वाढेल!


courtesy: Delphi Classics