मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Tuesday, April 18, 2017

'ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत'...बेपर्वा शेरेबाजी?...Vilas Sarang

एप्रिल १४, २०१७ ला  विलास सारंगांचा दुसरा स्मृतिदिन होता

विलास सारंग, 'लिहित्या लेखकाचं वाचन', २०११:

"...(अशोक) शहाणेंच्या 'क्ष- किरण' लेखाने बेपर्वा शेरेबाजी करण्याची पद्धत रूढ केली. ती इतरांबरोबरच (भालचंद्र) नेमाडेंनी आपलीशी केली..." (* तळटीप पहा)

"...सौन्दर्य शास्त्र  हे एक मायाजाल आहे व त्यापाठी लागून कितीकांनी  आपले शब्द वाया घालवले. मराठीला जरूर होती  संहितांचं  सूक्ष्म , कठोर परीक्षण करण्याची ..." 

मराठीतील द ग गोडसे, म वा धोंड,  विलास सारंग, वसंत सरवटे, दुर्गा भागवत आणि माझे वडील या लोकांमुळे समीक्षा हा प्रकार मला आवडायला लागला. सारंगांच्या सूचनेप्रमाणे मी फक्त जमेल तसे संहितेचे सूक्ष्म परीक्षण करतो.  सौन्दर्य शास्त्र म्हणजे काय हे मला माहिती सुद्धा नाही. मराठीतील आघाडीचे समीक्षक कित्येकदा काय म्हणत असतात हे मला जरा सुद्धा समजत नाही. मला माहित-आठवत  असलेल्या सगळ्या गोष्टींची- गद्य, पद्य, चित्र, शिल्प वगैरे - सांगड घालायचा प्रयत्न करतो. माहित नसलेले होईल तेव्हढे- online, offline- वाचतो. इंग्लिश जास्त वाचतो.

सारंगांची समीक्षेची पुस्तके म्हणजे अलिबाबाची गुहाच...प्रत्येक लेख खचाखच माहिती आणि निरीक्षणांनी भरलेला...त्यातून दिसणारी त्यांची बुद्धिमत्ता, विनोद बुद्द्धी, विद्वत्ता, इंग्लिश-मराठी भाषा प्रभुत्व....आपल्या आजाराबद्दल बोलताना कायम एक मिश्कील आवाज, जो कधीही सेंटीमेंटल होत नाही (स्वतःच्या कुटंबाबद्दल मात्र जवळ जवळ शांतताच पाळतात)....कुठलेही पुस्तक उघडून कुठेही वाचायला सुरु करा...एखाद मधुर गाण कुठूनही ऐकता येत तस...

'गुहे'त एक दोन दालनांचा अभाव मात्र प्रकर्षाने जाणवतो...सायन्स फिक्शन आणि ग्राफिक नॉवेल या प्रकारात जन्माला आलेल्या जगातील महान कलाकृतींबद्दल सारंग काहीच बोलत नाहीत...फिलिप के डिक (Philip K. Dick), जे जी बॅलार्ड (J G Ballard), अॅलन मूर (Alan Moore), आर्ट स्पीगलमन (Art Spiegelman)- मधले दोघ ब्रिटिश- कसे सुटले त्यांच्या नजरेतून?

दृश्य कलांबद्दल पण सारंग  क्वचितच लिहताना आढळतात... ठणठणपाळाबद्दल - कौतुकाने आणि थोड शिष्टपणे - लिहतात पण वसंत सरवटेंचा उल्लेख न करता:  'क्लोज रिडींग' मध्ये 'क्लोज वॉचिंग' येत नसाव!

... आणि त्यांची सगळीच मते पटतात असेही नाही...एक उदाहरण:

"...ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत. त्यांना 'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही..." असं ज्यावेळी सारंग लिहतात (पृष्ठ ४५, Ibid), त्यावेळी त्यांनी जोसेफ कॉनरॅड वाचला- क्लोज रिडींग  तर सोडाच- तरी आहे का याची शंका वाटते (अर्थात कॉनरॅडना ते पोलिश म्हणू शकतात!) कारण 'आतंकवादाच्या जमान्यात'  या लेखात त्यांचा उल्लेखही नाही. गेल्या दीड-दोनशे वर्षातील जगातील सगळ्यात मोठा द्रष्टा कादंबरी- कथा-लेखक म्हणून आज कॉनरॅड यांच नाव घेतल जात.

कॉनरॅड व्यतिरिक्त- फक्त विसाव्या शतकातील कथा, कादंबरीकार बोलायच तर- जॉर्ज ऑरवेल, ऑल्डस हक्सली, एवलिन वॉ, ग्रॅहम ग्रीन (आणि वर आलेले जे जी बॅलार्ड, अॅलन मूर)  : सगळे बिनडोक? कोणालाच  'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही?

ज्या रशियन क्रांतीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या क्रांतीचा मुडदा कसा पडला हे पहिल्यांदा ऑरवेलनी सर्वात प्रभावीपणे जगासमोर आणल, आणि ते सुद्धा एक पॅराबलच्या माध्यमातून.  १९४५ पासून त्या पुस्तकाची आजपर्यंत जगभरात अभूतपूर्व विक्री झाली आहे. ऑरवेलांचे 'Nineteen Eighty-Four', १९४९ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक पुन्हा एकदा या वर्षी, २०१६-२०१७, जगात बेस्टसेलर झाल आहे...

आता प्रश्न असा येतो: "...ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत. त्यांना 'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही..." याला 'बेपर्वा शेरेबाजी' म्हणत दुर्लक्ष करायच का आम्ही?

आणखी एक-दोन  निरीक्षण.

सारंग त्यांच्या 'अक्षरांचा श्रम केला', २००० मध्ये दुर्गाबाईंचा उल्लेखही करत नाहीत (मी स्वतः ते पुस्तक दोन-तीन वेळा कव्हर-टू-कव्हर वाचले आहे. ही पोस्ट लिहताना पुन्हा दोन-तीन वेळा दुर्गाबाईंसाठी चाळले. तुम्हाला काही वेगळे आढळल्यास जरूर कळवा.)... दुर्गाबाई त्यांना, त्यांनी बुद्धाचा ध्यास घेतल्यानंतर- त्याला मी दुसरा टप्पा म्हणतो- खऱ्या अर्थाने 'सापडल्या' असाव्यात आणि मग ते दुर्गाबाईंचे मोठे फॅन झाले...तस पहिल तर दुर्गाबाईंचे जवळपास सर्व लेखन 'अ.श्र.के.' प्रकाशित होण्याच्या आधी झाले होते.

पुढील लेखकांचा  उल्लेखही सारंग त्यांच्या समीक्षेंच्या पुस्तकात करताना मला दिसत नाहीत:  अण्णासाहेब किर्लोस्कर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं वि जोशी (ज्यांची जवळजवळ सर्व पुस्तके आज बाजारात विकत मिळतात), नाट्यछटाकार दिवाकर (दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, सदानंद रेगेंचे आवडते), वसंत सरवटे (केवळ एक लेखक म्हणून, चित्रकार म्हणून तर नाहीच नाही, सरवटेंनी एका वर्तमानपत्राला लिहलेल्या पत्राचा उल्लेख एकदा आला आहे.), गोविंदराव टेंबे (अभिजात संगीताचे भारतातले आघाडीचे समीक्षक आणि एक विचारी म्हणून), 'बहुरुपी'कार चिंतामणराव कोल्हटकर जे सारंगांसारखेच मराठीभाषाप्रभु होते...  त्यांनी हे लेखक वाचलेच नाहीत का?  का 'पहिल्या टप्प्यातील' दुर्गाबाईंसारखे ते त्यांना कधी महत्वाचे वाटले नाहीत?...

द ग गोडशांचा संगीत सौभद्र आणि अण्णासाहेब किर्लोस्करांचे लेखक म्हणून प्रकट झालेल कौशल्य यावरचा लेख: 'शतायुषी सौभद्र' त्यांनी वाचलाच नाही? गोडशांचा उल्लेख थोड्या कुत्सीत पणे 'औदुंबर' कवितेवरच्या लेखात मात्र येतो. याउलट ह ना आपटे, ना सी फडके आणि विसाव्या शतकातील कितीतरी (डझनाने) बऱ्यावाईट मराठी स्त्री-पुरुष लेखकांचे उल्लेख, त्यातील काही पोलिटिकल कऱेक्टनेससाठी, त्यांच्या लिखाणात येतात... काहीही असो, ही दुर्दैवी गोष्ट आहे....

सारंगांच्या गुहेतील मला आवडलेले एक रत्न... त्यांनी लिहलेला मोबी-डिक (१८५१) आणि मराठी वाचक यांचा संबंध:
"...मराठी वाचकांनी तर मोबी डिकसारखी कादंबरी वाचलीच नसती. (त्यांना वांती झाली असती) मोबी डिकमधली काही वर्णनं मोठमोठं व्हेल मासे कापण, भल्या मोठ्या परातीत ते तळण, धुराचा उग्र वास आणि हे सगळं रात्रीच्या काळोखात; अक्षरशः नरकाचं (Hell) वर्णन शाकाहारी वाचकांना 'टू मच' वाटेल..." (Ibid)

खालील अप्रतिम व्यंगचित्र दुसऱ्या एका अर्थाने असे पाहता येईल: कॅप्टन अहाब यांची कॉमेंटरी सुरु आहे...त्यांना थोडा सुगावा लागलाय आपल्या पाठी काय आलय याचा... बेपर्वा शेरेबाजीचे परिणाम महाकाय मोबी-डिक सारखे  मागे लागू शकतात!


कलाकार: Benjamin Schwartz, The New Yorker

* आता हे प्रसिद्ध झाले आहे की श्री. शहाणेंचा लेख त्यांनी श्री. नेमाडेंच्या साथीत लिहला होता.  पहा माझी ऑक्टोबर २७ २०१३ची पोस्ट 'Ashok Shahane Confesses and I Feel Cheated'. 

Friday, April 14, 2017

प्लेटोची बाराखडी, चातुर्वर्ण्य आणि खुनी इतिहास...Plato's Deadly Alphabets...

Today April 14 2017 is 126th birth anniversary of Dr. B R Ambedkar (भी रा आंबेडकर)


Isaiah Berlin, ‘The Crooked Timber of Humanity’, 1959:

“...The view that the truth is one and undivided, and the same for all men everywhere at all times, whether one finds it in the pronouncements of sacred books, traditional wisdom, the authority of Churches, democratic majorities, observation and experiment conducted by qualified experts, or the convictions of simple folk uncorrupted by civilisation – this view, in one form or another, is central to Western thought, which stems from Plato and his disciples...

...In Plato’s republic there is a rigid, unified hierarchy of three classes, based on the proposition that there are three types of human nature, each of which can be fully realised and which together form an interlocking, harmonious whole. Zeno the Stoic conceives an anarchist society in which all rational beings live in perfect peace, equality and happiness without the benefit of institutions. If men are rational, they do not need control; rational beings have no need of the State, or of money, or of law-courts, or of any organised, institutional life. In the perfect society men and women shall wear identical clothes and feed in a ‘common pasture’. Provided that they are rational, all their wishes will necessarily be rational too, and so capable of total harmonious realisation. Zeno was the first Utopian anarchist, the founder of a long tradition which has had a sudden, at times violent, flowering in our own time...”
 
John Gray, 'Plato and the Alphabet' from 'Straw Dogs: Thoughts on Humans and Other Animals', 2007:
"...Writing creates an artificial memory, whereby humans can enlarge their experience beyond the limits of one generation or one way of life. At the same time it has allowed them to invent a world of abstract entities and mistake them for reality. The development of writing has enabled them to construct philosophies in which they no longer belong in the natural world...Plato’s legacy to European thought was a trio of capital letters – the Good, the Beautiful and the True. Wars have been fought and tyrannies established, cultures have been ravaged and peoples exterminated, in the service of these abstractions. Europe owes much of its murderous history to errors of thinking engendered by the alphabet."

Dr. Sarvepalli Radhakrishnan, 'Indian Philosophy: Volume II", 1923:
"...The infinite dwells in all finite man is conscious of this fact. Though he is bound up with an organism which is mechanically determined by the past, the infinite ideals of truth, beauty and goodness operate in him and enable him to choose and strive for their greater expression It is because the infinite Brahman is revealed to a larger extent in human beings that they are entitled to ethical and logical activity..."

Friedrich Nietzsche (1844-1900):
"To be attracted to the Platonic dialogue, this horribly self-satisfied and childish kind of dialectic, one must never have read good French writers — Fontenelle, for example. Plato is boring. In the end, my mistrust of Plato goes deep: he represents such an aberration from all the basic Greek instincts, is so moralistic, so pseudo-Christian (he already takes the concept of "the good" as the highest concept) that I would prefer the harsh phrase "higher swindle" or, if it sounds better, "idealism" for the whole phenomenon of Plato."
"It is still a metaphysical faith that underlies our faith in science—and we men of knowledge of today, we godless men and anti-metaphysicians, we, too, still derive our flame from the fire ignited by a faith millennia old, the Christian faith, which was also Plato’s, that God is truth, that truth is divine.—But what if this belief is becoming more and more unbelievable, if nothing turns out to be divine any longer unless it be error, blindness, lies—if God himself turns out to be our longest lie?"

Dr. B R Ambedkar (1891-1956):

“...Chaturvarnya pre-supposes that you can classify people into four definite classes. Is this possible? In this respect, the ideal of Chaturvarnya has, as you will see, a close affinity to the Platonic ideal. ... The chief criticism against Plato is that his idea of lumping individuals into a few sharply-marked-off classes is a very superficial view of man and his powers. Plato had no perception of the uniqueness of every individual, of his incommensurability with others, of each individual as forming a class of his own. He had no recognition of the infinite diversity of active tendencies, and the combination of tendencies of which an individual is capable. ..Chaturvarnya must fail for the very reason for which Plato's Republic must fail—namely, that it is not possible to pigeonhole men, according as they belong to one class or the other...”


Stephen Cave, AEON, Feb 21 2017:

“... Throughout Western history, those deemed less intelligent have, as a consequence of that judgment, been colonised, enslaved, sterilised and murdered (and indeed eaten, if we include non-human animals in our reckoning) ...

...The story of intelligence begins with Plato. In all his writings, he ascribes a very high value to thinking, declaring (through the mouth of Socrates) that the unexamined life is not worth living. Plato emerged from a world steeped in myth and mysticism to claim something new: that the truth about reality could be established through reason, or what we might consider today to be the application of intelligence. This led him to conclude, in The Republic, that the ideal ruler is ‘the philosopher king’, as only a philosopher can work out the proper order of things. And so he launched the idea that the cleverest should rule over the rest – an intellectual meritocracy...”

भारतात 'सत्यम्, शिवम्, सुंदरम' / 'सुंदर, शिव, सत्य' केंव्हा आणि कुठून आले मला माहित नाही.  पण ते आता खूप लोकप्रिय झाले आहे. त्याचा उदय प्लेटोच्या उक्तीत असावा असे वाटते.  वर डॉ राधाकृष्णन सुद्धा प्लेटोच्या उक्तीचा पुनरुच्चार त्यांच्या ग्रंथात करतात. दुर्गा भागवतांच्या नावावर पण एक पुस्तक आहे: 'सत्यं शिवं सुंदरं', मी ते पाहिल नाहीय.

मी मराठी विश्वकोशात ही त्रिसूत्री शोधली,  त्यावेळी ही प्रमुख नोंद मिळाली: "...प्लेटो असे म्हणतो की, ‘सत्य, शिव सुंदर ही जी जीवनाची अंतिम मूल्ये आहेत, ती समजण्याची अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते, ते शिक्षण होय’..."
त्याशिवाय खालील दोन नोंदी मिळाल्या:


"प्रबोधनकालीन कला:..ॲरिस्टॉटल हा निसर्गप्रमाण मानणारा होता. निसर्ग स्वयंपूर्ण आहे, या जगामधील वस्तूंची सत्त्वे या निसर्गातच सामावलेली आहेत, म्हणून सत्य, शिव, सौंदर्य ही तत्त्वे सर्व ज्ञानविषयक या निसर्गविश्वातच ओतप्रोत भरलेले आहेत, अशा भूमिकेवर प्रबोधनकाळ आला. या निसर्गाचे निरीक्षण करून ज्ञान मिळवावयाचे आणि निसर्गाचे निरीक्षण करून सौंदर्याचा शोध घ्यावयाचा, ही ॲरिस्टॉटलची विचारसूत्रे प्रबोधनकाळात अत्यंत प्रभावी ठरली"

रोमन कॅथलिक पंथ:... दलित, उपेक्षित व गरीब बांधवांच्या मुक्तीसाठी चर्च प्रोत्साहन देते. ही गोष्ट विशेषतः दक्षिण अमेरिकेत दिसून येते. त्याचप्रमाणे ख्रिस्तेतर धर्मियांबरोबर घडून आणलेल्या सुसंवादाद्वारे प्रत्येक संस्कृतीतील सत्यम्, शिवम्, सुंदरमची जपणूक करण्यास चर्च प्रोत्साहन देते. आजच्या काळातील कॅथलिकांची ही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत...”


साने गुरुजी म्हणतात : "...जगात  जे जे काही सुंदर, शिव, सत्य दिसेल ते ते घेऊन वाढणारी ही (भारतीय) संस्कृती आहे..." (भारतीय संस्कृती, १९३७).

मला सानेगुरुजींचे म्हणण अजिबात पटत नाही. जगातील इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतीय संस्कृतीत सुद्धा अनेक भल्या बुऱ्या गोष्टी आहेत. पण मला त्या तीन शब्दांवर आपली संस्कृती वाढली अस वाटत नाही.

त्या तीन शब्दांचा एकमेकाशी काय संबंध आहे हे मला कधीच कळल नाही. सत्य, शिव, सुंदर या ऍबस्ट्रॅक्ट कल्पना मला पूर्णपणे सापेक्ष वाटतात. जॉन ग्रे वर म्हणतात त्याप्रमाणे त्या ऍबस्ट्रॅक्ट कल्पनां वरून महायुद्धे कशी छेडली जाऊ शकतात (गेली) याची कल्पना मी करू शकतो. ("Wars have been fought and tyrannies established, cultures have been ravaged and peoples exterminated, in the service of these abstractions. Europe owes much of its murderous history to errors of thinking engendered by the alphabet.") डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे प्लेटोंना प्रत्येक मानवाच्या अद्वितीयतेची, मानवाच्या असंख्य वैविध्यतेची पुरेशी कल्पना नव्हती. सत्य, शिव, सुंदर सारख्या कल्पनांवर एकमत होणे अवघड आहे आणि तसे ते करण्यात आले त्यावेळी नरसंहार घडले. 


सत्यं, शिवं, सुंदरं शब्दांवर आधारित दोन गाणी (एक मराठी, एक हिंदी) मात्र आवडतात!



David Hume and Plato conversing
 courtesy: Existential Comics

Thursday, April 13, 2017

बारा ज्यूरी मेम्बरान...12 Hangry Men


60 years ago, on April 13 1957, a great film,  '12 Angry Men', directed by Sidney Lumet was released.

भारतात शेवटची ज्यूरी-ट्रायल १९५९साली झाली : नानावटी मर्डर केस. त्यावर आधारित आणखी एक सिनेमा २०१६साली काढण्यात आला. श्री. अक्षय कुमार यांना त्यातील त्यांच्या भूमिकेसाठी नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी तो सिनेमा बघितला नाहीय व बघणार पण नाहीय. 'ये रास्ते है प्यार के', १९६३ हा सिनेमा मात्र मला बऱ्यापैकी आवडला होता. कै रवींचे संगीत आणि कै  लीला नायडूंच दिसण ह्या त्यातला सगळ्यात मोठ्या जमेच्या  गोष्ट होत्या / आहेत.

American crime story, a TV series that premiered in 2016, shows, among other things, the problems, to put it mildly, with a jury trial.  It's tragicomic to watch the way system comes apart as the days go by.



The men and women felt like hostages at the hotel - and were treated that way by some of the deputies
courtesy: FX  network and Daily Mail, UK

12 Angry Men is a trial film that tells the story of a jury made up of 12 men as they deliberate the guilt or acquittal of a defendant on the basis of reasonable doubt.

Here is a cartoonist's take on the film. 

Which is better? The cartoon or the film? (खालील चित्रातील उभे गृहस्थ आहेत, उत्कृष्ट काम केलेले, थोडेसे टकले, हेन्री फोन्डा)
 




Saturday, April 08, 2017

...I Will Keep Savouring Mr. Hamilton's Art ONLINE!

Today April 8 2017 is first death anniversary of William Hamilton (read my post soon after his death here.)


कै विल्यम हॅमिल्टन हे त्या (ह्याच्या आधीची पोस्ट पहा) ग्रेट लिस्ट मधल आणखी एक नाव...ऑनलाईन- ऑफलाईन ह्यावर पुष्कळ कार्टून्स आहेत... पण आपल्या सर्वांच्या ऑनलाईन आयुष्याची फिरकी घेणार इतक सुंदर कार्टून एखादच...(लक्षात घ्या सेक्स आता सर्रास ऑनलाईन, फ़ोनवर करता येतो!)




Artist: William Hamilton, The New Yorker, September 2012


Thursday, April 06, 2017

चपलेने मारणे हा लोकप्रिय वाकप्रचार आहे....पण चपलेमुळे कोणी मरू शकते का?...Chon Day@110

Today April 6 2017 is 110th birth anniversary of one of my favourite cartoonists, Chon Day (1907-2000).

चपलेने मारणे हा मराठीत फार लोकप्रिय वाकप्रचार आहे....नुसता वाकप्रचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृती सुद्धा कधीकधी मोठ्या मर्दुमकीचा भाग आहे...अलिकडच्या काळात आपण त्याचे प्रात्यक्षिक नॅशनल टेलिव्हिजन वर, व्हाट्सऍपवर खूप वेळा पहिले...कितीवेळा फटके मारले, कोणत्या ब्रँडची चप्पल होती हेही चर्चेचे विषय होऊ शकतात...पण चप्पलने मारून कोणी मेल्याचे अजून ऐकले नाही...

... पण चप्पल मुळे कोणी मरू शकते का?

'दी न्यू यॉर्कर' (The New Yorker) साठी ज्यांनी ज्यांनी आजवर व्यंगचित्रे  काढली आहेत त्यातील कितीतरी जणांना मी ग्रेट म्हणतो कारण ते ग्रेटच आहेत. मग विशेषणांची काटकसर का? काहीजण महान आहेत. ती लिस्ट थोडी लहान आहे.

त्या ग्रेट लिस्ट मधल एक प्रमुख नाव - चोन डे.

त्यांची काही चित्रे मी ह्यापूर्वी ह्या ब्लॉग वर दिली आहेत. पण खालील चित्र म्हणजे त्यांचे एक अप्रतिम चित्र आहे.

इ-कॉमर्सच्या आधीच्या दिवसातील बायकांच्या खरेदीवर मराठीत शेकडो चित्रे आजवर प्रसिद्ध झाली आहेत पण एक तरी चित्र ह्याच्या जवळ तरी जाते का पहा...


from The New Yorker, December 14 1946

I hate to do this....but just look closer at what the shoe salesman is pulling out of a shoebox. One can use the idea for say a sari salesman in India but the graphic may not turn out as smooth as this because the gun is shown looking similar to the dark colour shoe lying there creating a great camouflage....I feel so fortunate to have even seen this picture....

Monday, April 03, 2017

...Hatred of Hindus Was the Default Position of Many Influential People in Britain

Jenny Uglow:
"In India in the eighteenth century, before evangelical missionaries and politicians began to demonize Hindu culture, there was considerable fraternization and inter-marriage."

Geoffrey Moorhouse:

“...The last emperor was also known to his familiars as Zafar - the pen name he used when writing poetry - a word which means "victory" and which could scarcely have been less appropriate, given that it was attached to one of history's great losers. For he died five years after the mutiny, in faraway Burma, a frail 87-year-old who was spoon-fed on broth by the handful of family and retainers he had been allowed to take with him into exile. He had been banished not so much for what he did during the mutiny as for what he represented to the mutineers - Hindus as well as Muslims - who regarded him as the touchstone of an old and deeply rooted way of life which the Victorian Evangelicals, who dominated the making and execution of British policy, were determined to replace with the prejudices and habits of muscular Christianity. To them it was vital that Zafar should be put down, precisely because, having a Hindu mother, he appealed to both sides of India's own great religious division....”


William Dalrymple, ‘The Last Mughal: The Fall of a Dynasty: Delhi, 1857’, 2006:

“...Many historians blithely use the word ‘colonialism’ as if it has some kind of clearly locatable meaning, yet it is increasingly apparent that at this period there were multiple modes and very distinct phases of colonialism; there were also many very different ways of inhabiting, performing and transgressing the still fluid notion of Britishness. It was not the British per se, so much as specific groups with a specific imperial agenda – namely the Evangelicals and Utilitarians – who ushered in the most obnoxious phase of colonialism, a change which adversely affected the White Mughals as much as it did the Great Mughals....”

“...As far as the Indian participants were concerned, the Uprising was overwhelmingly expressed as a war of religion, and looked upon as a defensive action against the rapid inroads missionaries and Christianity were making in India, as well as a more generalised fight for freedom from foreign domination. The Great Mutiny has usually been presented by the Marxist historians of the 1960s and 1970s primarily as a rising against British social and economic policies, as both urban revolution and a peasants’ revolts parked off by loss of land rights and employment opportunities as much as anything else. All this certainly played a part. Yet when the Indian participants of the Uprising articulate the reason for their revolt – as they do with great frequency and at some length in the Mutiny Papers – they invariably state that they were above all resisting a move by the Company to impose Christianity and Christian laws on India – something many Evangelical Englishmen were indeed contemplating...”



Jon Wilson, 'India Conquered: Britain's Raj and the Chaos of Empire‘, 2016:
“...British officers thought the concern about animal fat was ridiculous. But Indian fears reflected an accurate understanding of British desires, if not the practical realities of Company rule. Take religion, for example. Among Britons in India, evangelical Christianity was on the rise in the 1840s and 1850s. Most British officers probably did think India’s Muslims and Hindus were infidels who would suffer eternal damnation if they did not convert. Proselytizing pamphlets had been circulated with greater frequency, even in cantonments. European religion and the British government seemed to occupy the same space, as the 1830s and 1840s saw new churches built in cantonments, often bringing the centres of British worship and British power within a few yards of each other. The British did talk about subjugating the whole of India to a single, unitary form of power, even if they saw the East India Company as a decidedly secular kind of authority...”


सतीची चाल अत्यंत क्रूर होती याबद्दल दुमत नाही. बरोबर? पण सतीचे सगळे 'पदर' भारतात कुठे चर्चिले जातात?

विद्वान श्रीमती वेंडी डॉनीगर (Wendy Doniger) त्यांच्या इंग्लिश पुस्तकात, 'दि  हिंदूज : ऍन अल्टरनेटीव्ह हिस्टरी' २००९ (The Hindus: An Alternative History),  मध्ये काय म्हणतात ते पहा:

"...Finally, in 1829, the year after Robertston’s intervention, several years after prominent Brahmins had already spoken up against suttee, and at a time when there were many Indians in the legislature and William Bentinck, an evangelical sympathizer, was Governor-General (1828-1835), the desire to justify their continuing paternalistic rule over Indians whom they characterized as savage children led the British to ban suttee altogether, as well as child marriage, with much self-aggrandizing fanfare.

The British law probably facilitated more women’s deaths than it saved, and its main effect was to stigmatize Hinduism as an abomination in Christian eyes.  Suttee is a pornographic image, the torture of a woman by fire, hot in every sense of the word. Relatively few women died that way, in contrast with the hundreds, even thousands who died every day of starvation and malnutrition, but suttee had PR value. Thus the Raj had it both ways, boasting both that it did not interfere with other people’s religions and that it defended human rights. The debate, in both India and Britain, turned what had been an exceptional practice into a symbol of the oppression of all Indian women and the moral bankruptcy of Hinduism. Nor did the 1829 law, or, for that matter, the new legislation enacted by India after its Independence put an end to it; at least forty widows have burned since 1947..."

बहुतेक सर्व भारतीयांना ह्यातल काही सांगितल जात नाही. उदा: गव्हर्नर जनरल बेंटिंक कसे 'एवंजेलिकल सिम्पथायझर' (evangelical sympathizer) होते. सतीबंदी कायद्यामुळे जेवढ्या बायका  वाचल्या त्यापेक्षा जास्त मेल्या. तसेच त्या कायद्याचा एक प्रमुख परिणाम म्हणजे ख्रिस्ती धर्मवासियांच्या डोळ्यात हिंदू धर्माबद्दल  घृणा निर्माण होऊन तो कलंकीत  झाला.

ह्या पोस्टच्या वरती दिलेली अवतरणे नीट वाचा. २१व्या शतकाआधी  मी कधीही वाचले नव्हते की, मोठ्या प्रमाणात, ब्रिटिश १९व्या शतकात भारतात धर्मपिसाट झाले होते म्हणून. हे का? आपण १९४७साली 'निधर्मी' झालो होतो म्हणून? का आपल्याला कॉमनवेल्थ जॉईन करायच होत म्हणून? म्हणजे मुघलांना धर्माबाबत कोणी काही म्हणाव पण ब्रिटिशांना नाही! का तर त्यांची आपल्याला आता गरज आहे, आपल्या कझिन्सना तिथ स्थायिक व्हायचय, त्यांच्या हातात जगातला प्रमुख लिबरल मीडिया आहे, ते आता प्रचंड श्रीमंत आहेत...!

महाराष्ट्रातील, माझ्या आवडत्या, २०व्या शतकातील महत्वाच्या विचारवंतांनी सुद्धा ब्रिटिशांच्या ह्या पैलूबद्दल खोलात जावून लिहल्याच आठवत नाही.  उदा - डॉ. आंबेडकर, श्रीपाद  कृष्ण, राजवाडे, शेजवलकर, र धों कर्वे, दुर्गा भागवत, सेतु माधवराव पगडी ...

शशी थरूर (Shashi Tharoor) यांचे 'इनग्लोरियस एम्पायर' ( Inglorious Empire) नावाच पुस्तक २०१६/२०१७ साली प्रसिद्ध झाले. बऱ्याच चर्चेत आहे ते पुस्तक सध्या.

Mr. Tharoor's book proves how bad the rule was for India.

Mr. Mihir Bose states in the December 2016 issue of History Today how "distrust of Hinduism was rife among Britain’s ruling class".

“...Yet Churchill was not the first to want to destroy Hinduism. For more than 200 years, hatred of Hindus was the default position of many influential people in Britain. The man who set this agenda was James Mill, whose 1817 text book The History of British India, became the most important at Haileybury College, where the civil servants of the East India Company were taught. ‘The Hindus’, Mills wrote, ‘are full of dissimulation and falsehood, the universal concomitants of oppression. The vices of falsehood, indeed they carry to a height almost unexampled among the other races of men.’ As for religion, Mill wrote,  ‘No people … have ever drawn a more  gross and disgusting picture of the universe than what is presented in the writings of the Hindus.’ ...”

"...After the revolt of 1857 there were calls to eradicate Hinduism. The Baptist preacher Charles Spurgeon told a congregation of 25,000 at Crystal Palace that ‘such a religion as the religion of the Hindoo, the Indian government were bound, as in the sight of God, to put down with all the strength of their hand’. And even after the British had left India, Hinduphobia persisted. Francis Tuker, who spent 33 years in the Indian Army, retired as head of Eastern Command in 1950. Writing of independent India, he feared the advance of Communism there: ‘The Iron Curtain … clanks down between Hinduism and all other systems and religions.’ Hindu India was entering a precarious phase, when it might swap its gods for another. ‘Its religion, which is to a great extent superstition and formalism, is breaking down … Communism will fill the void left by the Hindu religion. It seemed to some of us very necessary to place Islam between Russian Communism and Hindusthan.’..."

As is well known, many Indians were executed by blowing them from canons. Based on that, the above 'cartoon' appeared in Sydney Punch dated November 1868.


The third line in the caption says: "(Taken from an East Indian Recipe which was found remarkably efficacious, some years ago.)"