मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Saturday, December 23, 2023

मनुष्याची तहान आणि सिंह...Man's Thirst and Lion

 मनुष्य कसला प्राणी आहे पहा...  

आधी सिंहाबरोबर पाणी पितोय .... 

 Artist: Laszlo Reber  (László Réber) 1920-2001, Hungarian graphic artist, illustrator, cartoonist

पण माणसाची तहान काही भागेना... 

मग सिंहाच्या शिरातून प्यायला लागला ... 

Lion head drinking cup, c500BC-470BC, attributed to the Athenian Douris


Wednesday, December 20, 2023

१९७३ चा ऑइल शॉक आणि आमची फरफट ...How The Oil Shock of 1973 Affected Our Family and Mad Max 2

ह्या वर्षी ५० वर्षे झाली ... १९७३ च्या ऑइल शॉकला... 

आमचे पाच जणांचे कुटुंब त्यावेळी मिरजेस रहात होते. आम्ही lpg कनेक्शन अजून घेतले नव्हते. त्यामुळे आम्ही रॉकेल आणि कोळश्यावर घरातल्या इंधनासाठी अवलंबून होतो. 

मला नेमके कारण आणि त्याची व्याप्ती माहित नाही पण आम्हाला कोळसा मिळणे त्या सुमारास बंद झाले. मला वाटते पर्यावरणासाठी कुठलातरी निर्णय घेतला गेला असावा आणि त्याची अंमलबजावणी त्यावेळी सुरु झाली असावी. त्या मुळे आमच्या घरातील कोळश्याची शेगडी आणि चूल दोन्ही बंद पडल्या. 

आता आम्हाला रॉकेलला पर्याय उरला नव्हता. रॉकेल मिळाले नाही तर घरात काहीच शिजणार नव्ह्ते. पाणी तापणार नव्हते. आणि त्यात ऑइल शॉक.... 

असे म्हणतात की सरकारने पेट्रोलचे दर प्रचंड वाढवले आणि डिझेल आणि रॉकेलचे वाढवले नाहीत. असेल. पण अचानक (कदाचित वरील निर्णयामुळे) रॉकेल बाजारातून नाहीसे व्हायला लागले. 

मिरजे मध्ये एखाद्या दिवशी कुठे रॉकेल मिळत असेल ह्याचा काहीच भरवसा उरला नाही. केंव्हा रॉकेल लागेल याचा अंदाज बांधून त्याच्या आधी चार दिवस पायपीट सुरु,  ते मिळवण्यासाठी. प्रत्येक दुकानात जाऊन विचारायचे.

सुदैवाने रॉकेल न मिळाल्यामुळे घरी स्टोव्ह पेटला नाही असे कधी झाले नाही पण ती अनिश्चितता भयानक होती. ती किती महिने राहिली हे आता आठवत नाही. 

कोळसा मिळायचा बंद झाल्यामुळे आमच्या वर आणीबाणी ची वेळ आली आणि पुढे दोन वर्षात आणीबाणी सुद्धा आली!

ज्यावेळी नंतर "Mad Max 2", 1981 (After a global war resulted in widespread oil shortages, civilization collapsed, and the world descended into barbarism.) हा सिनेमा बघितला , त्यावेळी त्यातील पेट्रोल मिळवण्याची तडफड  बघून मला १९७३ -७४ काळातील आमची केरोसीन मिळवायची धडपड आठवत असे!

 


Sunday, December 17, 2023

मिली- सेंटी- डेसी - मीटर- डेका - हेकटो- किलोमीटर...Metrication and Decimalisation in My Life

 

मी चौथीत असताना, १९६८-६९, महाराष्ट्राने  नवीन दशमान आणि मेट्रिक पद्धत मराठी शाळेमधून जोरात अमलात आणायला सुरवात केली ... 
 
आणा गेला, चार आणे (२५ पैसे) , आठ आणे (५० पैसे) आले... १६ आणे फक्त भाषेत राहिले , व्यवहारात १ रुपया आला...आणा गेल्यानंतर त्याच सुमारास बाजारात एक पैशाचे छोटे नाणे आले, त्या शिवाय दशमान पद्धत पुरी होऊ शकत नव्हती (१-२-३-५-१०-२०-२५-५०-१०० पैसे अशी नवी मालिका होती), त्याला "नवा पैसा" म्हणत, तो पटकन वाक्प्रचारात पण शिरला: "एक नवा पैसा सुद्धा देणार नाही"...
 
मैल/कोस गेले किमी आले... शेर/ मण गेले किलोग्रॅम आला/ लिटर आले... यार्ड/ वार गेले मीटर आला (फक्त साडीत वार राहिलाय)... फूट/ इंच जाऊन सेंटीमीटर/ मीटर काही प्रमाणात आले... एकर जाऊन हेक्टर अजून पूर्णपणे आलेल नाही... फॅरनहिट गेले सेंटीग्रेड आले ...
 
तोळा जायचा होता आणि १० ग्राम यायचे होते पण तो मात्र अजून राज्य करतो आहे...
 
मी कधी जुने measurements फारसे व्यवहारात आणि शाळेत वापरले नाहीत... मराठीतील जुने साहित्य वाचताना नवीन लोकांना अडचण येते कारण कोणी ह्या बद्दल पुस्तकाच्या सुरवातीला बोलत नाही....
 
आता ज्यावेळी दशमान पद्धत शिकवली गेली, त्यावेळी आम्ही हे गाणे डझनावारी मोठ्यांदा म्हणत असून "मिली- सेंटी- डेसी - मीटर- डेका - हेकटो- किलोमीटर" , हेच वजनाबाबत थोडे बदलून, हेच द्रव्याबाबत थोडे बदलून ... 
 
मी आजवर आयुष्यात डेसी, डेका आणि हेक्टो वापरलेले नाही , फक्त अंकगणितात वापरले!
 
आता दशमान पद्धत केवढी व्यापक आहे हे शेजारच्या चित्रात पहा...
 

 

Thursday, December 14, 2023

Cholera epidemic of 1817, East India Company, Third Anglo-Maratha War and Mount Tambora

मी एप्रिल ४ २०२३ रोजी लिहले:

"एप्रिल महिना मला आठवण करून देतो इंडोनेशिया मधील माऊंट टॅमबोरा (mount tambora) चे ५ एप्रिल १८१५ च्या संध्याकाळी फुटणे, ज्या घटनेला उद्या २०८ वर्षे पूर्ण होतील ... 
 
त्या फुटण्याचे पडसाद तेंव्हापासून आजवर उमटत आहेत... 
 
In the year 1816 (popularly known as Year Without a Summer), in India, the monsoons did not arrive as expected, causing drought and water shortages at first, and then flooding during the dry season.
Peter Frankopan, "The Earth Transformed: An Untold History", 2023
 
"... The eruption devasted other regions, such as the Indian subcontinent, where a shift in monsoon rains, a failure of trade winds and a three-year depression of the thermal cycle of South Asia not only led to major reductions in crop yields and of maritime trade, but also served to change the microbial ecology of the Bay of Bengal. In 1817, unusually early and heavy rains brought about a surge in cases of cholera that caused death on an almost unimaginable scale. The bodies of the dead and dying were gathered together, wrote one eyewitness, with funeral pyres burning non-stop to incinerate the rich and the poor, and other corpses picked over by vultures or jackals. It was ‘a scene of woe which completely baffles the power of description to portray’...."
 
तत्कालीन मराठी लेखनात माऊंट टॅमबोरा चे उल्लेख मी कधी ऐकले किंवा पाहिलेले नाहीत (तुम्हाला माहित असल्यास कृपया येथे कळवा) पण त्याने झालेला नाश तर आपल्या पूर्वजांनी भोगला आहे ... 
 
१८१७-२४ सालात आलेल्या कॉलराने १०-२० लाख भारतीय लोक मारले. भारत (आणि महाराष्ट्र) पारतंत्र्यात पण १६७४ नंतर १८१८ साली पुन्हा गेला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे...."
 
पण ते पुस्तक ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा कॉलरा पसरवण्यातील  हाताबद्दल काहीच लिहित नाही. 

मी एप्रिल २०२३ मध्ये वाचले. 
 
Jonathan Kennedy त्यांच्या "Pathogenesis: A History of the World in Eight Plagues", २०२३ या पुस्तकात लिहतात : 
"... Cholera had been endemic in the Ganges Delta for many centuries. It first broke out of its original home in 1817, carried by East India Company troops as they tramped across the subcontinent; the Marquis of Hastings lost a third of his 10,000 men to cholera while fighting the Marathas...."
 
प्रा चिन्मय तुंबे त्यांच्या "The Age Of Pandemics: 1817-1920: How they shaped India and the World", २०२० पुस्तकात लिहतात:

"... By September, reports of a major cholera outbreak were pouring in from various parts of the Bengal province, a region comprising much of modern-day Bangladesh, West Bengal, Bihar, Jharkhand and coastal Odisha. The epidemic struck during the prelude to the Third Anglo-Maratha War and caught the English forces unawares. The governor general, Francis Rawdon-Hastings (1754–1826), was camping in Bundelkhand in November 1817 in a bid to oust the Pindaris, powerful mercenaries operating in central India under Maratha patronage. Cholera ripped through his camp, killing hundreds by the week...."

Frederick F. Cartwright and  Michael Biddiss, 'Disease & History: From ancient times to Covid-19':
 
"... In 1817 cholera broke out with great violence over the whole Ganges delta, which became notorious as a focus. Medical men in the area stated that it had not been seen in the delta before 1817 and considered it a new disease. Their opinion is now regarded with some doubt. A possible explanation is that cholera was endemic in Central India, then largely unexplored by Europeans, and made its way down river to the coast, carried by troop movements and river shipping...."
 
 
 
 

Anti-cholera inoculation, Calcutta, 1894 , courtesy : Wikimedia

 

Monday, December 11, 2023

सांजशकुन अर्पणपत्रिका...Little Bird You Only Hope To Know!

जी ए कुलकर्णींनी त्यांच्या 'सांजशकुन', १९७५ साठी लिहलेली अर्पणपत्रिका (epigraph):

"Over these unremembered marble columns,
birds glide their old remembered way.
Dive in red gold setting tide
And write dark alphabets on evening sky;
Whether an epitaph, chorus or strange augury -
Little man you only hope to know!"

ह्याबद्दल खूप लिहून झालाय , फेसबुक वर :

जंगजंग पछाडून हे verse कुठले आहे हे समजलं नाहीय....मला पहिल्यांदा वाटलं होत ते जीएंच्या आवडत्या Walter de la Mare यांच असाव... पण बहुतेक त्यांच नाहीये ....शिवाय हे कुठल्या लेखक/कवीच असत, तर जीएंनी त्याच/तीच नाव नक्की दिल असत.. मग हे स्वतः जीएंचच आहे काय?

ह्या verse इतके जबरदस्त मी आयुष्यात काही वाचल नाहीय....अधूनमधून संध्याकाळी मी आकाशाकडे पाहतो... त्यावेळी आमच्या इकडे तीन पातळ्यांवर पक्षी फिरत असतात... अगदी खाली चिमणी - कावळे -कबुतर, त्यावरती घार- क्वचित पोपट- पाकोळी.... आणि अगदी वरती कात्रज तलावाच्या ecosystem चे प्राचीन रहिवासी: बगळे....

केवढे व्यस्त असतात.... काय करत असतात हे सगळे? ...

"And write dark alphabets on evening sky;
Whether an epitaph (स्मरणार्थ कोरलेले शब्द), chorus (पालुपद) or strange augury (भविष्यवाणी).... "

ते पाहताना प्रत्येक वेळी हे शब्द माझ्या मनात येतात आणि मी स्तब्ध होतो ...

खरंच किती कमी समजलंय मानवाला ह्या जगाबद्दल आणि उड्या पहा केवढ्या मोठ्या..."


आता कल्पना करूया पक्षांनां आपल्या सारख चालायच आकर्षण निर्माण झालय....

Artist: Ellis Rosen, The New Yorker

p.s 

जीएंच्या इंग्लिश कवितेचा मी मराठीत केलेला अनुवाद:


"ह्या विस्मृतीत गेलेल्या संगमरवरी स्तंभांवरून
पक्षी घेतात त्यांची जुनी आठवणीतील संथ भरारी,
सूर मारतात तांबड्या-सुवर्ण अस्ताला निघालेल्या लाटेत
आणि लिहतात गूढ बाराखडी संध्याकाळच्या आकाशावर;
ते आहेत समाधीवरील शब्द, पालुपद का अपरिचित प्रारब्ध -
खुज्या माणसा ते समजायची तू फक्त आशा धरू शकतोस!"
"
(कृतज्ञता : कै जीए यांच्या वाङ्मयाचे कॉपीराईट होल्डर्स)

ही कविता जीए यांचीच आहे!

"जीएंची पत्रवेळा" मध्ये मे ११ १९७५ रोजी जीए ग्रेस ना लिहतात (पृष्ठ ५६, ५७) :

 "परवा एका जुन्या डायरीत लिहून ठेवलेल्या ओळी पुन्हा दृष्टीस पडल्या. अगदी अचानक. मी त्या विसरूनही गेलो होतो.... हे मराठीत जसेच्या तसे आणता येईल ? बहुदा नाही. पण बघू...".

Friday, December 08, 2023

तू गडे फुलांची राणी...Flower by N V Tilak and Nagamachi Chikuseki

ना. वा. टिळक :

वन सर्व सुगंधित झाले / मन माझे मोहुन गेलेकितीतरी

 

 मी सारे वन हुडकीले

फुल कोठे नकळे फुलले - मज तरी

स्वर्गात दिव्य वृक्षास

बहर ये खास

असे क्ल्पीले - असे क्ल्पीले/ मन माझे मोहुन गेले - कितीतरी

 

 परी फिरता फिरता दिसले

फुल दगडाआड लपाले - लहानसे

दिसण्यात फार ते साधे

परी आमोदे

जगामधी पहिले - जगामधी पहिले/ मन माझे मोहुन गेले - कितीतरी

 

मी प्रेमे वदलो त्यासी

का येथे दडुनी बसशी - प्रिय फुला?

तू गडे फुलांची राणी

तुला गे कोणी

रानी धाडिले- रानी लावीले? / मन माझे मोहुन गेले - कितीतरी

  

ते लाजत लाजत सुमन

मज म्हणे थोडके हसुंन - तेधवा

निवडले प्रभूने स्थान

रम्य उद्यान

तेच मज झाले- तेच मज झाले / मन माझे मोहुन गेले- कितीतरी


 Flower by Nagamachi Chikuseki, mid 18th-early 19th century

Tuesday, December 05, 2023

B S Mardhekar and Anton Sender...मधाळ पोळें/ ओठांवरती जमलें तेंही/ निसर्गातले, नैसर्गिक !...

 "...
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
निसर्गातले, नैसर्गिक !
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले ! न्हाले !"

(पृष्ठ ४१, २१, मर्ढेकरांची कविता, १९५९/१९७७)


artist:  Anton Seder (1850- 1916)

Pl. 15, Die Pflanze in Kunst und Gewerbe, Gerlach & Schenk pub.  (1887-1889)

Saturday, December 02, 2023

Al Jaffee, Fold-In आणि मराठी दिवाळी अंक आवाज

 #aljaffee

Al Jaffee ह्या महान व्यंगचित्रकाराचे एप्रिल १० २०२३ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले....
 
MAD ह्या जगप्रसिद्ध मासिकासाठी त्यांनी केलेले योगदान तोंडात बोट घालवणारे आहे... "Snappy Answers to Stupid Questions" हे त्यांचे सदर मला फार आवडे, पण मी त्याचे प्रयोग भारतात प्रत्यक्ष माणसांवर केल्यावर काही माणसे वैतागली!...
 
त्यांचे सगळ्यात मोठे संशोधन होते - १९६४ साली मॅड साठी त्यांनी सुरु केलेले "Fold-In", म्हणजे अंकात एका पानभर चित्राला मधून उघडले की आत दुसरे चित्र...आणि ती दोन्ही मोठी चित्रे परस्परांशी जोडलेली असत...
 
ज्यांनी पूर्वी आवाज किंवा इतर काही दिवाळी अंक पाहिले असतील त्यांना हा प्रकार चांगला परिचित आहे (आवाज मध्ये आतील चित्र थोडे त्यावेळच्या मानाने "चावट" असायचे.) मला लहानपणी Fold-In प्रकार फार आवडत असे. आवाज आणि मराठी वाचकांवरती Al Jaffee यांचे ऋण आहेत. 
 
आवाज सारखी लोकप्रियता माझ्यामते दुसऱ्या कोणत्याही मराठी दिवाळी अंकाने अनुभवलेली नाही... तो अंक महाग असे... पण काही दिवसात तो बाजारातून संपला असे.. 
 
तर ह्या आवाज साठी दीनानाथ दलालांनी १९६५ च्या दिवाळी अंकासाठी काढलेली चित्रे सोबत... नुकतेच भारत- पाकिस्तान युद्ध सप्टेंबर मध्ये संपले होते... लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते .. समोर आकाशात माओ, चाऊ एन लाय वगैरेंची मुंडकी आहेत... खाली आयुब खान आहेत ...
 

 
कृतज्ञता : दलाल यांच्या कलाकार्याचे कॉपीराईट होल्डर्स

Wednesday, November 29, 2023

The Age of Sail...and Hell...

 असे म्हटले जाते की ब्रिटन ने एकेकाळी जगावर प्रभुत्व गाजवले त्यांच्या नौदला मुळे ... 

अलीकडे (एप्रिल २०२३) Stephen R. Bown यांचे 'Scurvy: how a surgeon, a mariner, and a gentleman solved the greatest medical mystery of the age of sail' पुस्तक चाळत आहे आणि त्यातील माहिती अद्भुत आहे!

मी माझ्या चौथी मध्ये १९६८-६९ साली स्कर्व्ही बद्दल पहिल्यांदा वाचले आणि तो शब्द आणि त्या रोगाचे कारण डोक्यात जाऊन अडकले. त्यामुळे मी ह्या पुस्तकाकडे आकर्षित झालो. 

हा एक परिच्छेद पहा, ब्रिटनच्या १८व्या शतकातील बलाढ्य नौदला बद्दल:

"...The Royal Navy needed at least double the number of able-bodied seamen who would willingly serve. In eighteenth-century Britain men frequently disappeared from seaport towns and villages. Wandering alone they were clubbed, dragged aboard ships in port, and “recruited” into the navy. Many were never seen by their families again...."... सोबतचे चित्र नौदल भरतीचे आहे!

 

पुढे जाऊ. 

"...Mariners in the eighteenth century suffered from a bewildering array of ailments, diseases, and dietary deficiencies, such that it was next to impossible for surgeons or physicians to accurately separate the symptoms of one from those of another. Niacin deficiency caused lunacy and convulsions, thiamin deficiency caused beriberi, and vitamin-A deficiency caused night blindness. Syphilis, malaria, rickets, smallpox, tuberculosis, yellow fever, venereal diseases, dysentery, and food poisoning were constant companions. Typhus, or typhoid fever, was common on every ship. Spread by infected lice in the frequently shared and rarely cleaned bedding, typhus was so prevalent in the navy that it was known as “ship’s fever” or “gaol fever.” Man-of-war and merchantman, both were a cozy den for disease.

 Life shipboard was not conducive to curing or avoiding any of these varied ailments, and indeed was an ideal environment for spreading them. The sailor’s wooden world was infested with refuse, trash, rotting flesh, urine, and vomit. The mariners were either crammed into their quarters like sardines in a box or slept, occasionally in good weather, sprawled like hounds on the deck. The holds were crammed with vermin, festering and spoiled provisions, and in some cases rotting corpses. On English and Dutch ships, the primarily Protestant dead sailors were wrapped in their hammocks and pitched overboard—with proper ceremony, naturally. But on the ships from Catholic countries such as France and Spain, the decaying bodies were stowed in the gravel of the hold, mouldering for perhaps months until the ships returned to home port and the dead could be buried in their native soil....

... Sanitary conditions aboard ships, and particularly the warships of national navies, were as bad as or worse than the filthiest slums then in London, Amsterdam, Paris, or Seville. The cramped, stifling, congested forecastle, where the crew slept, was dark and dingy. The air was clouded with noxious bilge gasses and congested with the sweet, cloying reek of rot and sweat. Sailors slept in dirty bedding and wore the same vermin-infested rags for months on end.... "

फ्रेंच आणि स्पेन च्या नौदलात वारलेले नौसैनिक कित्येक महिने तसेच गुंडाळून होल्ड मध्ये ठेवले जात... 

अजून पुस्तकाचे पहिले प्रकरण सुद्धा संपले नाहीये....

Sunday, November 26, 2023

Indian War of Independence, 1857 and Suez Canal...१८५७च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धामुळे सुएझ कॅनॉल घडला

While browsing S. C. Burchell's "The Suez Canal", 2016, I came across this...

"...But a day came when the opposition to the canal received a serious setback. In March 1857, near Calcutta, the disastrous Great Mutiny began. Native troops revolted against the British, and reinforcements had to be rushed to India in order to put down the rebellion. Of course, the only way they could be rushed from England was by ship on the four-month-long voyage around the Cape of Good Hope. It was painfully obvious that a canal through the Isthmus of Suez would have saved countless British lives. As it turned out, the British government was finally forced to beg Said’s permission to send troops through Egypt overland across the isthmus to the Gulf of Suez. English newspapers were quick to see their government’s folly. “Nothing could be a more complete avowal of the utility of M. de Lesseps’ scheme,” said the London Daily News, “and the action of the Government is the implicit condemnation of Lord Palmerston and Lord Stratford de Redcliffe.”

A personal opponent of de Lesseps’s was removed when, because of a general lack of confidence in his government, Lord Palmerston’s cabinet fell in February 1858...."

Look at the situation in 1855:

"...Britain’s powerful navy patrolled the waters from Gibraltar to Alexandria and guarded the sea lanes that led to India around the Cape of Good Hope. Any threat in these two areas was a blow at her heart. And it happened in 1855 that the Frenchman Ferdinand de Lesseps was making such a threat. To Great Britain, the idea of a canal through the Isthmus of Suez was unthinkable. The British had long dominated the route to the Far East around the Cape of Good Hope and were not interested in any change. Moreover, the canal now proposed - the British government felt with some justice - would be monopolized by the French, despite de Lesseps’s insistence that it was to be an international undertaking. If France controlled the canal, British prestige would decline throughout the Middle East. Its Indian empire would be in danger and so, too, would its leadership in trade with the Orient. In the eyes of the British government, the political aspect of a Suez canal was a simple one. De Lesseps had hold of a dangerous idea, and to add to the unpleasantness, he was a Frenchman as well. The British were going to fight, and the first battlefield they chose was Constantinople...."


 cover artist: Dinanath Dalal