Sunday, July 26, 2026

दीनानाथ दलाल यांचे 'रक्त आणि अश्रू' ....Erich Maria Remarque's 'All Quiet on the Western Front'

 

आज आपण बरेच जण वैश्विक, वैश्विक साहित्य म्हणून खूप दिंडोरे पिटतो ... पण मराठी साहित्यात फारशी दोन्ही विश्व महायुद्धे नाहीत ... ४० लाख भारतीयांनी प्रत्यक्ष दोन युद्धात भाग घेऊन आणि त्यातील १ लाख ६० हजार पेक्षा जास्त सैनिकांनी सर्वोच्च बलिदान देऊन सुद्धा!
 
१९४० च्या दशकात वाङ्मय शोभा या गाजलेल्या मराठी मासिकात आझाद हिंद सेना अनेक वेळा येती पण नुसते युद्ध तितक्यावेळी येत नाही ... 
 
पहिल्या महायुद्धात बहुतेक भारतीय सैनिक बहुजन होते आणि त्यांच्यामध्ये तसा अनुभव घेतलेले कथा-कादंबरी लेखक व्हायचे होते ...
 
'कटचा वेढा' (Siege of Kut) १९१५-१६ मध्ये कितीतरी मराठी भाषिक सैनिक अडकले होते. प्रचंड उपासमार सुरू झाली होती. घोड्याचे मास खाणे हा एकमेव उपाय उरला होता. मराठी सैनिकांनी धर्मभ्रष्ट होऊ म्हणून खायला नकार दिला. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी शाहू महाराजांना (१८७४-१९२२) विचारल की ते मास खाल्ल तर चालेल का. महाराजांनी त्यांना परवांनगी तर दिलीच पण अतिशय हेलावून टाकणारे पत्र लिहल....
 
कटचा वेढा यावर, जर त्यात भाग घेतलेल्या कोल्हापूर संस्थांनाच्या सैनिकाचे मराठी पुस्तक प्रसिद्ध झाले असते तर ते आज मराठी साहित्यासाठी एक मैलाचा दगड ठरले असते ... 
 
विश्राम बेडेकरांच्या रणांगण या पुस्तकाला दुसऱ्या महायुद्धाची कादंबरी कसेबसे म्हणता येईल ...
 
माझ्या लहानपणी माझ्या आयुष्यातील पहिल्याच दशकात दोन मोठी युद्धे भारताची झाली आणि त्याचे परिणाम सगळीकडे दिसले , आजही दिसतात...
 
माझ्या वडलांनी १९६५ च्या सुमारास "तुम्ही पराक्रमाचे पुत्र" नावाची कादंबरी लिहली , त्याची प्रेरणा त्यांना Erich Maria Remarque यांच्या अत्यंत गाजलेल्या 'All Quiet on the Western Front', १९२९ कडून मिळाली होती हे मला काही वर्षांनंतर स्पष्ट झाले कारण Remarque यांच्या सर्व कादंबऱ्या मला घरात माळ्यावर सापडल्या आणि मी त्या मराठी शाळेत शिकत असताना वाचायला सुरु केल्या! आवडल्या ... 
 
All Quiet on the Western Front कादंबरीचा शेवट हृदयद्रावक आहे - पहिल्या महायुद्धात शस्त्रसंधी झाल्यानंतर सुद्धा काही गोळ्या सुटल्या आणि सैनिकांचे प्राण घेऊन गेल्या , त्यातच आपला नायक आहे.... 
 
"...I stand up.
I am very quiet. Let the months and years come, they can take nothing from me, they can take nothing more. I am so alone, and so without hope that I can confront them without fear. The life that has borne me through these years is still in my hands and my eyes. Whether I have subdued it, I know not. But so long as it is there it will seek its own way out, heedless of the will that is within me.
————
He fell in October 1918, on a day that was so quiet and still on the whole front, that the army report confined itself to the single sentence: All quiet on the Western Front.
He had fallen forward and lay on the earth as though sleeping. Turning him over one saw that he could not have suffered long; his face had an expression of calm, as though almost glad the end had come."
 
दीनानाथ दलालांचे 'रक्त आणि अश्रू" हे दीपावली मासिकाच्या दिवाळी १९४५ साठी काढलेले चित्र पाहून मला Remarque यांच्या महान पुस्तकाच्या शेवटाची आठवण झाली आणि जसे शाळेत असताना मी अंतर्मुख झलो होतो तसेच व्हायला झाले .... 
 
हे चित्र म्हणजे त्या काळच्या मानवजातीच्या अंतर्मनात उसळणाऱ्या युद्ध-वेदनांचा आणि मातृत्वाच्या करुणेचा प्रतीकात्मक स्फोट आहे.
 
१. चित्रातील दृश्य: तारांच्या कुंपणावर ओवाळलेला सैनिक — त्याचे शरीर पुढे झुकलेले, हात थरथरत लोंबकळत आहेत. त्याच्या रक्ताने माती लाल झाली आहे.
पाठीमागे प्रचंड आकाशात एक स्त्रीचा चेहरा — तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत. त्या स्त्रीचा चेहरा भूमातेचा आहे — तिच्या अंगावरच्या प्रत्येक जखमेचा हा सैनिक प्रतिनिधी आहे.
दलाल यांनी येथे रंगांचा अत्यंत जाणीवपूर्वक वापर केला आहे —
लाल रंग रक्त, माती, वेदना आणि जीवनाच्या अखेरच्या तेजाचा द्योतक आहे. पिवळसर केशरी पार्श्वभूमी युद्धाच्या ज्वाळा आणि मरणाचे दाहक तेज दाखवते.
आकाशातील फिकट, पण असह्य दुःखाने भरलेला चेहरा हे दाखवतो की युद्धाचा शेवट फक्त रणांगणावर नाही, तर प्रत्येक मातेच्या अंत:करणात घडतो.
 
२.  'रक्त आणि अश्रू' — शीर्षकाचे गांभीर्य: ‘रक्त’ म्हणजे पुरुषार्थ, संघर्ष, मरण, आणि ‘अश्रू’ म्हणजे स्त्रीत्व, करुणा, ममत्व. दलाल यांनी या दोन भावनांना एका चौकटीत एकत्र आणले आहे —जणू युद्धाने फाडलेल्या पृथ्वीवर माणुसकी अजूनही आपल्या डोळ्यांतून वाहत आहे. 
 
३. Remarque यांचा ‘All Quiet on the Western Front’ आणि दलाल: Remarque यांच्या शेवटच्या पानावरचा तो शांत मरण —
आणि दलाल यांच्या चित्रातील स्तब्ध रक्तरंजित शरीर —दोन्ही ठिकाणी एकच अंतर्मुख शांतता आहे. ती युद्धानंतरची नव्हे, तर माणुसकी संपल्यानंतरची शांतता आहे. Remarque यांनी शब्दांत जे सांगितले, ते दलाल यांनी रंगांत सांगितले. एका पिढीने युद्धाचा अनुभव कसा आत्म्याच्या खोलवर नेला, हे दोघांनी आपल्या माध्यमांतून मांडले.
 
४. १९४५चा संदर्भ: १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला होता. हिरोशिमा-नागासाकीची राख अजून गरम होती. त्याच वेळी भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीला जोर चढत होता. दलाल यांनी हे चित्र या दोन जागतिक आणि भारतीय वास्तवांमधल्या मानवी वेदनेच्या बिंदूवरून काढले आहे.
 
दलाल यांचे हे चित्र त्यामुळे फक्त ऐतिहासिक दस्तऐवज नाही, तर कालातीत नैतिक आरसा आहे.
 

 
 कलाकार: दीनानाथ दलाल, दलाल आर्ट स्टुडिओ
 
सौजन्य व आभार: महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार