... मिरजेच्या भारत भूषण शाळेत तिसरी मध्ये (१९६७-६८) फाऊंटन पेन (त्यावेळी बॉलपेन म्हणजे काय आम्हाला माहीतच नव्हते) वापरायला आम्हाला सांगण्यात आले. बोरू अभ्यासक्रमातून काढूनच टाकला गेला (तरी तिसरी, चौथीत आम्हाला बोरूलेखनासाठी पुस्तक घ्यायला लागले, ते वाया गेले)...
शाई भरणे हा मोठा कार्यक्रम असे, आई भरून द्यायची पण कधी दुकानातून सुद्धा भरून घ्यायचो, ते महाग पडत असे, unbranded शाया काही दुकानात असत , फाऊंटनची निबे सारखी मोडत असत, ती बदलून पहिल्यांदा दुकानातूनच घ्यायचो, निबे कधी चांगली असत, कधी अगदी वाईट....
फाऊंटन पेने इतकी वाईट असत की त्याच्या मानेतून थोडी शाई सारखी बाहेत येत राही त्यामुळे अंगठा आणि त्याच्या जवळचे बोट कायम निळे-ओले असे , ज्याला ती बोटे लागत तिकडे शाई लागत असे ... मला त्या ओलीची जाणीव आजही आहे ... ते मला अजिबात आवडत नसे... शिसपेन्सिली सुद्धा वाईट असत ...
ही भारताची अवस्था १९६०च्या दशकात होती ... समाजवाद शिगेला पोचला होता...